Sharad Pawar यांच्या नंतर Chhagan Bhujbal NCP अध्यक्ष ?

शरद पवारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सक्षम नेतृत्व छगन भुजबळच !
2 मे ला “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मवृत्त पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी “मी राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे”, असे जाहीर केले. (Sharad Pawar declair resign from NCP President) त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात भूकंप आला. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त करात, पवार साहेबांनी या निर्णय मागे घ्यावा यासाठी खूप आग्रह धरला. पण एकूणच शरद पवार यांची राजकीय वाटचाल पाहता ते एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. त्यामुळे ते हा निर्णय सुद्धा परत घेणार नसल्याचे दिसते. म्हणून त्यामुळे राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार ? (Who will be the new president of NCP? ) यावर महाराष्ट्रभरात चर्चा होताना दिसून येत आहे.
शरद पवारानंतर त्यांच्याच परिवारातील अजित पवार – Ajit Pawar अथवा सुप्रिया सुळे – Supriya Sule हे अध्यक्ष होतील असे सुद्धा बोलल्या जात आहे. तसा राष्ट्रवादीचा एक गट ज्यात जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यादी पवारांच्या बाजूने असल्याचे दिसते. तर छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यासारखे दुसऱ्या बाजूने असलेले दिसतात. कदाचित यांचा सुप्रिया सुळे यांना सुद्धा पाठिंबा असू शकतो. अजित पवार राज्य पातळीवर सक्षम नेतृत्व असल्याचे सर्वजण बोलतात. पण त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर कमकुवत असल्याचे सांगतात. तेच सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत, त्या देश पातळीवर सक्षम नेतृत्व करू शकतात. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुद्धा त्यांना गौरवण्यात आले आहे. परंतु त्या राज्य पातळीवर कार्यक्षम नसल्याचे म्हटले जाते. त्यातच मग “दिल्लीत ताई, तर राज्यात दादा” असे समीकरण जुळत असल्याची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
परंतु राष्ट्रवादीचा अध्यक्ष (NCP President) निवडताना, राष्ट्रवादी समोरचे आव्हाने व भविष्य यावर सुद्धा शरद पवार यांना लक्ष ठेवावे लागेल. यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे, नेमकाच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कमी झाला आहे. तो परत मिळवणे हे खूप मोठे आव्हान नवीन अध्यक्ष समोर असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वांची मर्जी राखत राज्यात पक्षाची पाळीमुळे बळकट करून केंद्रात सुद्धा पक्षाला बळकट करणे महत्त्वाचे असणार आहे. या दोन्ही बाबतीत दादा आणि ताई सक्षम नसल्याचे बोलल्या जात आहे. मग पवार साहेब नेमकी कोणाची निवड करणार ? हा खूप मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र समोर उभा ठाकला आहे. (Who will be the new NCP president ? )
साधारणतः शरद पवार स्वतःला पुरोगामी तथा फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पाईक मानतात. त्यामुळे त्यांना आता ते सिद्ध करण्याची वेळ आली, असून खऱ्या दृष्टीने भाकरी नव्हे तावाच फिरवण्याची वेळ आली आहे. एकूणच भारतीय राजकारणात घराणेशाहीला अनन्य साधारण महत्त्व आहे. सर्वच पक्षात घराणेशाही असल्याचे आपणास दिसते. परंतु शरद पवार साहेबांना वैचारिक पातळीवर पुरोगामित्व बळकट करण्यासाठी या घराणेशाहीला छेद देण्याची ही योग्य वेळ आहे.
राष्ट्रवादीमध्ये फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा चालवनारेस क्षम नेतृत्व पाहायचे झाल्यास एका व्यक्तिमत्त्वाचे नाव प्रकर्षाने समोर येते, ते म्हणजे छगन भुजबळ – Chhagan Bhujbal होय.

राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या पूर्वीपासून शरद पवारांच्या सोबत सक्षमपणे साथ देणारे छगन भुजबळ नेहमीच राष्ट्रवादीच्या कठीण काळातील शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले.[ads1]

सुरुवातीला शिवसेनेतून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात करणारे छगन भुजबळ हे आपल्या सुरुवातीच्या काळात एक आक्रमक युवा कार्यकर्ते होते. शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात छगन भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे. मराठी अस्मितेसाठी वेशांतर करून बेळगाव मध्ये घुसत त्यांनी आंदोलन केले. वेळप्रसंगी जेल सुद्धा पत्करली. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा अनेक आंदोलने घडवून आणले.[ads2]

90 च्या दशकात मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून वैचारिक मतभेद झाल्याने छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि शरद पवारांचे नेतृत्वात काँग्रेसमध्ये वाटचाल सुरू केली. तेथूनच शरद पवार आणि छगन भुजबळ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असे समीकरण बनले.

ते आतागायत सुरू आहे. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना (NCP Foundation) झाली. त्यावेळी शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, (Sharad Pawar NCP President) त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली. [ads3]
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोप झाल्याने छगन भुजबळ यांना अटक झाली. त्यावेळी “पुतण्याला वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी दिला गेला” असे महाराष्ट्रभर चर्चिला गेले होते. परंतु तरीही छगन भुजबळांनी या सर्वांची पर्वा न करता शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळे छगन भुजबळ आता संपला, असे वाटत असताना जेल मधून बाहेर येतात फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घेऊन राजकारणातली आपले पाळेमुळे परत घट्ट केली. [ads4]

शरद पवार Sharad Pawar सुद्धा छगन भुजबळांच्या पाठीशी नेहमीच वटवृक्षासारखे उभे राहिले. मग ते 1993 मध्ये महात्मा फुले यांच्या पुण्याचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून राष्ट्राला समर्पित करणे असो, की मंडल आयोगाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणे असो. छगन भुजबळांच्या मागणीची अंमलबजावणी शरद पवारांनी नेहमी करत आले. [ads5]

छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे 54% पेक्षा जास्त असणाऱ्या ओबीसी प्रवर्गाचे नेतृत्व करतात. ओबीसी आरक्षणासाठी, मंडल लागू करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. छगन भुजबळ हे मुंबईपासून चंद्रपूर- गडचिरोली, बीड-धाराशिव, कोल्हापूर-सोलापूर, पर्यंत पोहोचलेलं एक खंबीर नेतृत्व आहे. ओबीसी प्रश्नासाठी छगन भुजबळ-गोपीनाथ मुंडे यांची पक्षविरहित जोडी सर्वश्रुत आहे. ओबीसींना बळकटी प्राप्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, पटना येथीही लाखोंच्या सभा घेतल्या. त्यामुळे छगन भुजबळ महाराष्ट्र सोबतच देशातील ओबीसी नेत्यांची चांगला संपर्क ठेवून असणारे नेतृत्व आहे. उत्तर प्रदेश, बिहार हे उत्तरेकडील बहुल लोकसंख्या असणारे आणि ओबीसी बेस राज्य आहेत. भुजबळांचे लालूप्रसाद, यादव शरद यादव यासारख्या ओबीसी नेत्यांची, तथा छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, यूपी, बिहार चे अनेक मंत्रि यांच्याशी चांगली जवळीक आहे. [ads1]
आताच दोन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये देशपातळीवर ओबीसी नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शरद यादव म्हणाले होते की, “देश पातळीवर ओबीसींचे नेतृत्व करण्याची क्षमता छगन भुजबळांमध्ये असून त्यांचे हात आपण देशभरातील सर्व ओबसिंनी बळकट करणे महत्त्वाचे आहे”. यावरूनच छगन भुजबळ फक्त राज्य लेव्हलचे नेतृत्व नसून राष्ट्र पातळीवर नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध होते. [ads2]
एकूणच महाराष्ट्रासोबतच देशाचा विचार करायचा झाल्यास ओबीसी हा एकाच धागा आपल्याला दिसून येईल. मग ह्याच धागा पकडून शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादीची सगळी सूत्रे छगन भुजबळांच्या हाती दिल्यास. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा प्राप्त होऊन देशपातळीवर एक मोठा पक्ष सिद्ध होऊ शकतो. म्हणून फुले-शाहू-आंबेडकरांचा खरा वारसा शरद पवारांना Sharad Pawar राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे चालवायचा असल्यास फुले शाहू आंबेडकरांचा सक्षम वारसा सांगणारे एकमेव नेतृत्व मध्ये छगन भुजबळ हेच होत. [author title=”प्रविण बोचरे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2023/05/Pravin-bochare.jpg”]संपादक क्रांतिसूर्य न्यूज मीडिया, मोबाईल – ९६०४२९५८९१[/author]
हे अगदी शंभर टक्के खरंय परंतु वास्तवात आणण्यासाठी अनेक अडचणी आहेत.आजकाल घराणेशाही सर्वत्र पसरली असलेल्या काळात अजित पवार भुजबळांना स्विकारतील असं वाटतं का?