राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न
धाराशिव (उस्मानाबाद) दि. 28 | श्री क्षेत्र तुळजापूर येथे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची राज्यस्तरीय चिंतन बैठक राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍड. श्री. बी. एल. सगर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर तपस्वी मठ हॉल तुळजापूर येथे दि.27/10/2022 रोजी संपन्न झाली.
या बैठकीत जात निहाय जनगणना, पदोन्नती मधील आरक्षण, क्रिमिलियर ची मर्यादा वाढवणे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढ करणे, सरकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती करून ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आशा अनेक विषयावर वक्त्यांनी आपली मते मांडली.
श्री किल्लारीकर यांनी कुठलीही गोष्ट मागत असताना इतरांबद्दल द्वेष, तिरस्कार न बाळगता, आपण आपल्या समाजाचे भले करत असताना कुठल्याही प्रकारची तेढ दोन्ही समाजात निर्माण होणार नाही, सामाजिक सलोखा अस्तित्वात राहील व हा समाजाचा गावगाडा व्यवस्थित चालेल याची काळजी समाजातल्या प्रत्येक घटकाने घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत सरकारकडून होत असलेल्या विविध योजनांचा त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आढावा सादर केला.
बैठकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, हिंगोली, पुणे, लातूर विदर्भ तथा कोकणासह जिल्ह्यातून सर्व जिल्हाध्यक्ष सर्वश्री अत्तार सर, निलकंठ लिंगे, राजुरे, गणेश अवचार, गजानन पांचाळ, हिरालाल पाटील, एस एस.घुगे, लहु राक्षे, तुकाराम सगर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्यात घेणार असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच येत्या दोन महिन्यात राज्यभरातील दहा हजार सदस्य नोंदणीची सुरुवात आजच्याच कार्यक्रमातून करत असल्याचे सांगितले.[ads1]
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे सरचिटणीस अनिल नाचपले, उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, कार्याध्यक्ष संतोष डोंगर खोस, समन्वयक विजय पिनाटे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री लक्ष्मण दावणकर, कार्याध्यक्ष सुहास दराडे, लातुर जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा श्रीम.रेखा सुडे, अनुराधा पोटे, भारत काळे, यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.[ads2]
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने, सरचिटणीस राजेंद्र लोहार, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मेहेत्रे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री अनंत फुलसुंदर,सचिन राऊत,विशाल जाधव, तालुकाध्यक्ष सर्वश्री परमेश्वर साखरे, मच्छिंद्र बोकडे, बालाजी माळी,केशव काळे,बापु काळे, कल्याणी सुतार,खंडाळकर, गोविंद कुंभार, यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांनी व सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता पंकज काटकर सर यांनी केले.