आपला जिल्हा

पातोंडा येथे बळी उत्सव साजरा

पातोंडा, ता. चाळीसगाव – दि. 26 | बलिप्रतिपदा निमित्त महात्मा फुले प्रणित सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांपैकी एक भाग म्हणजे सम्राट बळीराजा महोत्सव (बळी उत्सव) कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. भा. महात्मा फुले समता परीषेदे तालुकाध्यक्ष श्री कैलस भगवान जाधव आणि प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक सरपंच पांडुरंग आधार माळी, मा. सभापती श्री संजय पाटील व मा. सरपंच श्री आबा पहिलवान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराजा गृप अध्यक्ष गोविंद वाघ यांनी केले सत्यशोधक समाज संघाच्या वतीने बळी पाडव्यानिमित्त सकाळी आठ वाजता शिवदत्त मंदिर पातोंडा येथे सम्राट बळीराजाचे प्रतिमा पूजन केले, कृषि संस्कृति जोपासणारे, सत्यशोधकी विचार आचरणारे सर्व पुरोगामी कृतिशील बंधुची मोठ्या संख्येत कार्यक्रमास उपस्थिती लाभली

बळीराजाचा वंशज अन् शेतकरी बळी सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता ! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर

बळी उत्सव

बळीराजा हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता! आज हि दसरा दिवाळी आली की, बहुजन समाजातील महिला ओवाळतांना त्यांची आठवण करतात. आणि अभिमानाने बोलतात कि “ईडा पीडा टळो, बळीराजाचे राज्य येवो” असा आमचा महानायक बळीराजा होय. इत्यादी माहीत कैलस जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले.

याप्रसंगी श्री सच्चिदानंद जाधव, चेअरमन बालू महाजन, माळी मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव महाजन, मा. चेअरमन विश्वास देशमुख, बळीराम गोविंदा महाजन, रामदास मोकासरे, सुभाष फकीर माळी, भगडे, मधू आबा, भगवान अहिरे, भरत अहिरे, एकनाथ माळी, दत्तात्रय देशमुख, नाना फौजी, आयुब पठाण, शेतकरी राजा, तरुण, बगायतदार, आधुनिक शेतकरी, जेष्ठ श्रेष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान रोकडे तर आभार संत सावता डेअरी चे चेअरमन विलास माळी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुळनिवासी बळीराजा गृप, सत्यशोधक विचार मंच अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

Please read also….

महात्मा फुलेंचा ‘सत्यशोधक समाज’ नेमका काय आहे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button