शेतकर्यांना पिक विम्याचा लाभ द्यावा- निवेदनाद्वारे अजय तायडे यांची मागणी
खामगाव- दि.14 | खरीप हंगाम २०२१ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात अतिव्रुष्टी झालेली आहे .त्यामुळे शेतकर्यांचे फार मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे . शेतकर्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी विमा कंपनी कडे पैसे भरुन विमा काढलेला आहे . परंतु क्राँप कँलेंडर पुढे करुन विमा कंपनीने सर्व शेतकर्यांना विम्याचा लाभ न देता फक्त २ आक्टोबर २०२१ पर्यंत तक्रार केलेल्या शेतकर्यांनाच विम्याचा लाभ दिला आहे .
त्यामुळे पिकविमा काढुन सुध्दा शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित आहेत . परंतु बुलडाणा जिल्हा क्रुषी विभागाकडे प्रस्ताव पाठवुन जिल्ह्यात पेरणी उशिरा झालेली असल्या मुळे २ आक्टोबर नंतर तक्रार केलेल्या शेतकर्यांनाही विम्याचा लाभ देण्याबाबत प्रस्तावीत केल्याची माहिती मिळाली आहे . त्यामुळे शेतकर्यांचे झालेले पिकाचे नुकसान लक्षात घेता त्यांना लाभ देणे गरजेचे आहे, त्याकरीता आपले स्तरावरुन प्रयत्न करावे व शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे कडे निवेदनाव्दारे केली.
यावेळी चर्चा करतांना नानासाहेब पटोले यांनी सांगितले की या विषयावर मंत्री मंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली असुन शेतकर्यांना पिकविमा नुकसान भरपाई निश्चीतच दिल्या जाईल . यावेळी आमदार राजेशजी एकडे , बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे , काँग्रेस पक्षनेता ज्ञानेश्वरदादा पाटिल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटिल, महा.प्रदेश काँग्रेस चे सचिव धनंजय देशमुख, काँग्रेस शहर अध्यक्ष किरणबाप्पु देशमुख उपस्थीत होते .