सावित्री- जिजाऊ दशरात्रौ महोत्सव- मा सभापती सौ. ज्योतीताई तायडे यांच्या उपक्रमाची शासनाने घेतली दखल
खामगाव-दि. 31| क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता माँ साहेब जिजाऊ यांचे जयंतीचे निमित्ताने दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवून देशात अनेक वर्षापासुन साजरा होत आहे. परंतु शासनस्तरावर पहिल्यांदाच पंचायत समिती खामगावच्या तत्कालीन सभापती सौ ज्योतीताई अजय तायडे यांनी 2010 मध्ये दशरात्रौ महोत्सवाचे आयोजन केले होते . यावेळी महिला मेळावा , रक्तदान शिबिर, कृषी मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा , आरोग्य शिबीर , नेत्र तपासणी शिबीर , जनावरांचे तपासणी शिबीर असे अनेक उपक्रम राबवून सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली होती.
बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम शासकिय स्तरावर राबविल्या गेला पाहिजे, अशी अपेक्षा विविध सामाजीक संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि सावित्रीबाई फुले व राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचेवर श्रध्दा असणाऱ्या वर्गाची होती . आता शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले व राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे जयंतीचे निमित्ताने दशरात्रौ उत्सवाचे आयोजन करण्यासाठी शासन स्तरावरून आदेश निर्गमित केल्याबद्दल पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. ज्योतीताई अजय तायडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत .