आपला जिल्हा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दरम्यान सौ रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्तीतीत सौ मनिषा भोपळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश

मुंबई- दि. 24 ऑक्टोबर |  – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यातील आढावा बैठक मिरा भाईंदर येथे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मिरा भाईंदर विधानसभा मतदासंघाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आदरनिय भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरनिय महीला प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सौ मनिषाताई भोपळे मिराभाईदर मुंबई यांच्यासह त्याच्या शेकडो कार्यकर्ते नी पक्षाच्या ध्येयधोरणे स्विकारत पक्ष प्रवेश घेतला.

आदरनिय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार घेऊन राष्ट्रवादी तळा गाळा पर्यंत पोहचवण्याच काम कार्यकर्त्यांनी करावा. आदरणीय साहेबांच्या विचारांच्या विद्यापीठात वावरत असताना समाजातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल अस काम करावे.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, माजी खासदार आनंद परांजपे, सेलचे सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रमोद हिंदुराव, मुश्ताफ शेख, अंकुश मालुसरे, माया कटारिया, सुप्रिया माईनकर, पोर्णिमा काटकर, निर्मला सावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button