आपला जिल्हा

अतिवृष्टीग्रस्त खामगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱयांची मागणी

खामगाव- दि. ०७ | यावर्षी सर्व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे सरकाने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांना तालुकातील शेतकरी बांधवांनी निवेदना मार्फत केली आहे.

सदर निवेदनात असे नमूद आहे की, सन २०२१-२०२२ खरीपातील पिक विमा कंपनीने अटी, शर्ती व निकष वगळता शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करावा. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नसेल त्यांना सरकारने एकरी ५० हजार रूपये मदत देण्यात द्यावी. खामगांव तालुक्यात धान्य उत्पादक, कापूस उत्पादक, फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. तरी शासनाने यावर्षी संपुर्ण तालुक्यात सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी काढुन ओला दुष्काळ जाहिर करावा. यासाठी सर्व शेतकरी यांच्याकडुन आज आपणास सरकार मायबाप म्हणुन कळकळीची विनंती करण्यात येत आहोत.

सदर निवेदन तहसीलदार खामगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना देण्यात आले असून. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलडाणा,पालकमंत्री बुलडाणा यांना देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर किसान सभेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोपडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बोचरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश दांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भगवान लाहुडकार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश देशमुख यांच्यासह गजानन दांडगे, सारंगधर खंडारे, सुगदेव खंडारे, राघव वावगे, सिद्धार्थ गवळी, निलेश देशमुख, निलेश गवळी, जगदेवराव दाभाडे, कैलास सिरसाट, योगेश घाटे, किसना गवळी, विश्वनाथ गवळी, नितीन सूर्यवंशी इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button