महाराष्ट्र

योग्य नियोजनाने अभियंता सुभाष निखाडे यांनी शासनाची ११४.२६ कोटींची बचत केली

महाराष्ट्र शासनातर्फे गौरव पुरस्कार देऊन अभियंता दिनी केले सन्मानित

यपश्चिम विदर्भातील जिगाव प्रकल्प हा बुलडाणा जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्हयातील बऱ्याच भागात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. परंतु कोणताही प्रकल्प म्हटला की त्यासंबंधी पुनर्वसनाच्या किचकट प्रक्रियेला तोंड द्यावे लागते. कित्येक वेळा पुनर्वसन करताना शासकीय अधिकाऱयांच्या नाकी नऊ येतात.

मात्र जिगाव प्रकल्पातील बुडित क्षेत्रामध्ये येणाऱ्या मौजे हिंगणे ईसापूर व मौजे हिंगणे दादगाव ता.नांदुरा जि. बुलडाणा या बाधित गावठाणाचे एकत्रीत पुनर्वसन करून नविन संकल्पना साकारण्यात आली. दोन गावाचे एकत्रीत पुनर्वसन केल्यामुळे नविन पुनर्वसीत गावठाणात देण्यात येणाऱ्या नागरी सुविधेच्या कामामध्ये व भूसंपादनामध्ये शासनाची करोडो रुपयाची बचत झाली. तसेच ग्रामस्थांना सुद्धा एकत्रीत पुनर्वसनामुळे २ गावांचे एका छोट्या शहरामध्ये पुनर्वसन झाल्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध होऊन गावाचा विकास चांगल्याप्रकारे होणार आहे. ही संकल्पना जिगाव उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सुभाष निखाडे ह्यांनी प्रत्यक्ष साकारली आहे.

अभियंता सुभाष निखाडे यांनी जिगांव प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील मौजे- हिंगणा ईसापूर व हिंगणा दादगांव ता-नांदुरा जि-बुलडाणा या दोन गावठाणाचे एकत्रित पुनर्वसन करुन शासनाची रुपये १२.२१ कोटीची बचत केली. तसेच कमी कालावधीमध्ये पुनर्वसन करुन नवीन आदर्श निर्माण केला आहे. मौजे पातोंडा ता-नांदुरा या नवीन पुनर्वसीत गावठाणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून भुसंपादनाचे कामामध्ये स्वतः जबाबदारी स्वीकारुन रुपये १३.६४ कोटींची शासनाची बचत केली आहे.

जिगांव प्रकल्पांतर्गत असलेल्या १३२/३३ के.व्ही सबस्टेशन कामामध्ये १३२ के. व्ही टॉवर लाईनचे काम प्राप्त मंजूरीनुसार न करता स्वयंस्फुर्तीने नवीन संकल्पना राबवुन व त्यानुसार मंजुरी प्राप्त करुन रुपये- ८८.४१ कोटी ची शासनाची बचत केली आहे. अशी एकुण ११४.२६ कोटी रुपयांची शासनाची बचत केली आहे.

जिगाव प्रकल्पाचे बुडित क्षेत्रातील बाधीत झालेल्या गावठाणाचे पुनर्वसन करताना हा एक नविन आदर्श निर्माण झालेला असून, त्यामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यात भरीव मदत होणार आहे. तसेच जिगांव प्रकल्पा अंतर्गत असलेल्या विविध कामामध्ये नविन संकल्पना वापरून शासनाची ११४.२६ कोटी रुपयाची बचत करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे व उपविभागीय उपविभागीय अधिकारी सुभाष निखाडे ह्यांना गौरव पुरस्कार देऊन अभियंता दिनी गौरविण्यात आले आहे. ही बाब जिगाव प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अभियंता वर्गाला तसेच प्रकल्पाचे बुडित क्षेत्रातील ग्रामस्थांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारी आहे.

यापूर्वी सुद्धा २००५ मध्ये उपविभागीय अधिकारी सुभाष निखाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. तर आता पुन्हा निखाडे यांची शासनाची बचत केल्यामुळे गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कोराडी प्रकल्प तालुका मेहकर येथे काम करत असताना प्रकल्प मध्ये येणाऱ्या पाण्याचा अभ्यास करून त्यावर स्वयंचलित दरवाजे बसवून अतिरिक्त ५.५० दशलक्ष पाणी मीटर साठा संचित करण्यात आला आहे. शासन मापदंडानुसार सदर कामाची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असून काम फक्त 50 लक्ष रुपये मध्ये पूर्ण केले आहे.

तसेच पेन टाकळी प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यातून तापी खोऱ्यात आणण्याकरता एक किमी लांबीच्या बोगद्याचे अतिकुशल ते चे काम निखाडे यांनी कमी कालावधीत पूर्ण करून पश्चिम विदर्भात प्रत्यक्षात अशी योजना अमलात आणलेली आहे त्यामुळे अभियंता सुभाष निखाडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांचे काम अनेक अभियंत्यांना प्रेरणादायी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button