ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल ! ओबीसी प्रबोधन शिबिरात प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन
अकोला-१६ ऑगस्ट | ज्यांना आरक्षण मुक्त देश बनवायचा आहे, ते ओबीसींचे कैवारी असल्याचे भासवत असताना आपण कुठवर बळी पडायचे याचा विचार करण्याची वेळ आली असून, ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. हरी नरके यांनी सोमवारी येथे केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पश्चिम विदर्भ’ विभागीय प्रबोधन शिबिरात ते बोलत होते.
संत तुकाराम चौकातील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराचे उद्घाटन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते, समता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी रवी सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. नरके यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, लेखक उत्तम कांबळे यांनी दिवसभर विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
ओबीसी आरक्षण आणि ना.छगन भुजबळ यांचे योगदान यावर बोलताना प्रा. नरके यांनी राज्यातील ओबीसी आरक्षण लढे आणि संघर्षाचा आढावा घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली. वाशीमच्या विकास गवळी यांनी जिल्हा परिषद बाबत सुप्रीम कोर्टात याचिका टाकल्याने देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यात जमा आहे. माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करून लोकांचा संभ्रम वाढविला आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल देशाला लागू असतात त्यामुळे आगामी काळात जसजशा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यात ओबीसी आरक्षण नसेल, केंद्र सरकार इंपेरिकल डेटा द्यायला तयार नाही, देवेंद्र फडणवीस पासून सगळे नेते म्हणतात केंद्राला डेटा मागण्याची गरज नाही, भाजप मधील ओबीसी नेते ओबीसी समाजाची घोर फसवणूक का करीत आहेत असा सवाल प्रा. नरके यांनी केला.
[highlight color=”blue”]लोकशाही समाजवाद प्रस्थापित होणे गरजेचे- रावसाहेब कसबे[/highlight]
सकाळच्या सत्रात रावसाहेब कसबे यांनी देशातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकत ओबीसी समूहाची सांस्कृतिक फसवणूक वैदिक व्यवस्था आजही कशी करीत आहे. हे नक सांगितले. तसेच जगात लोकशाही समाजवाद प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रावसाहेब कसबे यांनी केले.
[highlight color=”yellow”]आरक्षण मागणे म्हणजे जाती अंताचा विचार स्वीकारणे होय उत्तम कांबळे[/highlight]
समारोप सत्रात ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे यांनी शाहू महाराज आणि आरक्षण’ या विषयावर मांडणी करताना शाहू, फुले आंबेडकरांना समजू घेतल्याशिवाय आरक्षण समजू शकत नसल्याचे सांगितले, आरक्षण मागणे म्हणजे जाती अंताचा विचार स्वीकारणे होय, गुलामीच्या साखळ्या तोडण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे, जो समाज प्रश्न जागे ठेवतो आणि त्याच्यासाठी लढत राहतो त्याची प्रगती होते असे कांबळे म्हणाले.
[highlight color=”orange”]तरुण पिढीला प्रबोधनाचे धडे देण्याची गरज : सत्यपाल महाराज[/highlight]
आजच्या तरुण पिढीला समाज प्रबोधनाचे धडे देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी समारोप सत्रात केले. संत महापुरुषपांच्या विचारधारेतून नवा समाज निर्माण करण्याकरिता समाजाला प्रबोधन शिबिरांची गरज असल्याचेही त्यांनी सांगीतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.संतोष हुशे, मा. आ.हरिभाऊ भदे, मा. आ.बळीराम शिरस्कार, मा आ.प्रा. तुकाराम बिडकर, ओबीसी नेते विजय कौशल, विलास वखरे, अनिल शिंदे, गजानन वाघमारे, सुभाष सातव, गणेश खारकर, जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष दत्ता खरात, संतोष खांदेभराड, समन्वयक अनिल नळे, प्रवक्ते प्रा.संतोष वीरकर, सदानंद माळी इ. उपस्थितीत होते
शिबिरासाठी विभागीय अध्यक्ष अरविंद गाभणे, विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, प्रा. श्रीराम पालकर, विजय उजवणे, उमेश मसने, प्राचार्य किशन मेहरे, गजानन म्हेसने, ज्योती भवाने, कल्पना गवारगुरु, माया इरतकर, दीपमाला खाडे, सुष्मा कावरे, रामदास खंडारे, सपना राऊत, अनिल मालगे, बाळकृष्ण काळपांडे, नेहा राऊत, श्रीकृष्ण बोळे, सदानंद मुसकुटे, संजय तायडे यांनी परिश्रम घेतले.