आधुनिक भारताचा पहिला महात्मा – डॉ.नूतन लोणकर – नेवसे
जोतीरावांन कल्याणासाठी व उद्धारासाठी घेतलेले अपार कष्ट केलेला महान त्याग व सोसलेल्या हालअपेष्टा मानहानी शूद्रादी अतिशूद्र, स्त्रिया, शेतकरी व कष्टकरी या वर्गाच्या उद्धारासाठी क्रियाशील कृती करणारे अविरतपणे प्रयत्न करणारे व झटणारे जोतीराव हे या देशातील पहिले जनसामान्यातील असामान्य नेते होते. ह्या ध्येयासाठी त्यांनी जो सर्व क्षेत्रात लढा दिला, जी मानवतेची महान सेवा केली. त्यासाठी जो महान त्याग केला त्याला या देशात, मानवतेच्या इतिहासात तोड नाही जोतीरावांनी केलेल्या कार्याचे ऋण फिटणे शक्य नाही.
जोतीरावांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होणार होती याच सुमारास सत्यशोधक समाजाच्या अनुयायांनी जोतीरावांचा सत्कार करण्याचे निश्चित केले. नारायणराव लोखंडे ,स्वामी अय्यावारू, शेट राजू बाबाजी, डॉक्टर लाड, मामा परमानंद, बेहरामजी मलबारी, रावबहादूर वंडेकर, माधवराव रोकडे, भाऊ कोंडाजी पाटील, बाळाजी कुसाजी डुंबरे पाटील, जाया कराडी, दामोदर सावळाराम यंदे, कृष्णाजी भालेकर व शेकडो जोतीरावांचे अनुयायी सत्कार समारंभाच्या तयारीला लागले सत्कार समारंभाच्या निमित्ताने किमान प्रत्येकाला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणार होती.
हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कामाला लागले. मुंबईतील एक श्रेष्ठी रावबहादुर वंडेकर आणि नारायणराव लोखंडे यांच्या सह्या निशी निमंत्रण पत्रिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या. 11 मे 1888 हा दिवस ठरविला मुंबईतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही आमंत्रण देण्यात आले बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनाही आमंत्रण देण्यात आले परंतु काही कामामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी या समारंभास शुभेच्छा दिल्या. व जोतीराव जोतीरावांना ‘महात्मा ‘पदवी बरोबर ‘हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन’ या पदवीने गौरवण्यात यावे असा निरोप दामोदर सावळाराम यंदे यांच्याकडे पाठविला. जोतीरावांचा सत्कार मांडवी तील कोळीवाड्यात घेण्यात आला. कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता या कार्यक्रमासाठी जोतीरावांचे हजारो कार्यकर्ते उस्फूर्तपणे तिथं जमा झाले होते.
रावबहादुरांनी प्रस्ताविक करून जोतीरावांच प्रचंड कार्य विशद केलं नंतर अनेकांनी भावनावश होऊन भाषणे केली व जोतीरावांचा आपल्या भाषणात गौरव केला. गगनभेदी टाळ्यांच्या कडकडाटात जोतीरावांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण केली. त्याकाळी धनाढ्य व उदार व्यक्तीचा गौरव झालेला असेल, राजकीय नेत्यांचा ही त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव झालेला असेल, परंतु हिंदुस्थानातील कोणत्याही व्यक्तीचा सामान्य जनतेने अशा प्रकारचा व अशा भावनेने यापूर्वी कधीच गौरव केलेला नव्हता.
आपल्या चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि दलित जनतेने व्यक्त केलेली अमर्याद प्रेमाची भक्तीची आणि कृतज्ञतेची भावना पाहून जोतीरावांचे हृदय गहिवरले उत्तरा दाखल केलेल्या भाषणात ते म्हणाले, ‘माझ्या कनिष्ठ आणि दलित बंधूंच्या बाबतीत जे माझे कर्तव्य होते ते मी केले, त्यासाठी मी झगडलो, लढलो. माझ्या अनुयायांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याचा आणि संदेशाचा अदम्य उत्साहाने नेटाने आणि चिकाटीने खेड्यापाड्यांतून प्रसार करावा’. जोतीराव हे आता जनतेचे ‘महात्मा’ ठरले. खरे महात्मा ज्यांचे मन आणि आत्मा उंचावलेली आहेत असा तो पुरुष सामान्य जनतेने त्यांच्या चरणी भक्ती वाहिली असा तो महात्मा.
महात्मा ही पदवी त्यांना सामान्य जनतेनेच स्वयंस्फूर्तीने दिली असे दुसरे उदाहरण दुर्मिळच. आधुनिक भारतातील दलित आणि कनिष्ठ वर्गाकडून उच्चतम अशी हि पदवी मिळविलेल्या पहिला महापुरुष म्हणजे जोतीराव. महात्मा म्हणजे मानवजातीचा विश्व भक्त जोतीरावांच्या हृदयात वास करीत असलेला महात्मा अखिल मानवावर प्रेम करणारा विश्व भक्त होता. जोतीरावांचे नाव घेते वेळी महाराज सयाजीराव गायकवाड त्यांच्या नावापूर्वी हटकून ‘महात्मा’ ही बहुमान दर्शक उपाधी वापरीत ते जोतीराव जोतीरावांना आधुनिक हिंदुस्थानातील खरा महात्मा म्हणत असत. बहुजन व पददलित समाजाला अज्ञानातून वर काढून त्यांचा उद्धार करणारा व त्याला अर्वाचीन काळी जागविणारा ह्या देशातील पहिला महापुरुष जोतीराव होय असे अभिमानाने महाराज म्हणत. म्हणूनच जोतीरावांना महात्मा या बहुमानाने ते गौरवित जोतीरावांचे कार्य विशाल आहे. व त्यांचा त्याग तर त्याहूनही अधिक थोर आहे त्यांनी ज्या मार्गाने कार्य केले त्या मार्गाने कार्य झाल्यास आपल्या देशाचा उद्धार होईल व त्यातच खरे आपल्या देशाचे हित आहे. महात्मा बुद्धाप्रमाणे मानवजातीच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी जोरावांनी कार्य केले व महान त्याग केला म्हणून त्यांना ‘महात्मा’ म्हटले पाहिजे असे महाराज म्हणत असत.[ads1]
येरवड्याच्या तुरुंगात असताना महात्मा गांधी म्हणाले ‘जोतीराव हे खरेखुरे महात्मा होत’. शूद्रादी अतिशूद्र, स्त्रिया शेतकरी व कष्टकरी यांच्या हितासाठी इतक्या सहजतेने झटणारा व त्यासाठी मोठा त्याग करणारा हिंदुस्तानच्या आजपर्यंतच्या इतिहासात हा एकटाच थोर पुरुष झाला आहे म्हणून त्याला महा – महात्मा म्हणण्याचे धैर्य दाखवले तर ते यथायोग्य होणार आहे .ईश्वराने शूद्रादी अतिशूद्र स्त्रिया शेतकरी व कष्टकरी यांना जन्म दिला जोतीरावांनी त्यांना मनुष्यत्वाची व हक्काची ओळख करून देऊन खर्या अर्थाने त्यांचा उद्धार केला म्हणून त्यांना महात्मा म्हणणे सार्थ होईल.[ads2]
संदर्भ ग्रंथ: 1) आम्ही पाहिलेले महात्मा फुले- संपादक प्राध्यापक हरी नरके, 2) महात्मा जोतीराव फुले- धनंजय कीर, 3) महा- महात्मा जोतीरावर फुले व्यक्ती व कार्य- ॲड.राम कांडगे, 4) महात्मा फुले एक मुक्त चिंतन- जी.ए.उगले, 5) महात्मा जोतीराव फुले चरित्र- पंढरीनाथ सिताराम पाटील,[author title=”डॉ. नूतन लोणकर -नेवसे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/05/Screenshot_20220511-144240_WhatsApp.jpg”]मु़. पो. नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा मो. नं. 9623031635.[/author]