अजून इथला जातीवाद संपला नाही…

हो अजून इथला जातीवाद संपला नाही. तो वर्गवादाच्या रूपाने आम्हाला दररोज छळतो, कधी शासकीय ऑफिसात, तर कधी भांडवलदारांनी उभ्या केलेल्या साम्राज्यात, आमच्या माय बापाने पिढ्यान् पिढ्या कष्ट उपसले. आम्ही यांची गुरे वळली, आम्ही यांच्या शेतात कामे केलीत, आम्ही वतनदारांच्या घरी सालाने कामे केली, आम्ही माळ्या- कुणब्यांनी यांच्यासाठी शेत पिकवली, आम्ही सुतारांनी यांच्यासाठी लाकडी वस्तू बनविल्या, आम्ही तेल्यांनी यांच्यासाठी घाणीचे तेल काढले, आम्ही पाथरवटांनी यांच्यासाठी घरे बांधली, आम्ही शिंप्यांनी यांच्यासाठी कापडे शिवलित, आम्ही परिटांनी यांची कापडे धुतलेत, आम्ही नाभिकांनी यांच्या हजामती केल्या, आम्ही सोनारांनी यांच्यासाठी आभूषणे घडवली, आम्ही गोंधळ्यांनी यांच्या इथ गोंधळ घातला, आम्ही गवळ्यांनी यांची गायी,गुरे ढोरे राखली, आम्ही यांना दररोज आवश्यक वस्तू मिळाव्या यासाठी वंशपरंरागत काम केलीत, आम्ही बारा बलुतेदार – अठराअलुतेदारांनी हजारो वर्ष यांची इमाने इतबारे चाकरी केली, सेवा केली. तरी आमच्या मागचं दारिद्र्य संपलं नाही.
आमच्यातल्याच तथागत भगवान बुध्दाने या जगाला शांतीचा संदेश दिला, आमच्यातल्याच बळीराज्याने शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं, आमच्यातल्याच संतांनी वारकरी संप्रदायातून या महाराष्ट्रात धार्मिक एकात्मता निर्माण, आमच्यातल्याच विज्ञानिष्ठ संत सावता महाराजांनी कर्मसिद्धांत सांगून कामातच देव मानला, आमच्यातल्याच संत नामदेवांनी धार्मिक एकात्मतेची पताका पंजाब पर्यंत फडकवली, आमच्यातल्याच जगतगुरु तुकाराम महाराजांनी धार्मिक वर्चस्ववादाला मोडीत काढत जगातील पहिली शेतकरी कर्जमाफी केली, आमच्यातल्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार- अठरा अलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून स्वतःच्या मातीत स्वाभिमान जागवला, आमच्यातल्याच महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी आपली करोडोची संपत्ती लुटून सर्वासाठी शिक्षणाची द्वारे खुली करीत पहिली मुलींची शाळा सुरू केली, आमच्यातल्याच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेशी झगडून सर्वांना खऱ्या अर्थाने संविधानरुपी जगण्याचा अधिकार दिला.
आम्हाला स्वातंत्र्यानंतर आशा होती की आमचं नशीब बदलेल, म्हणून मग आम्ही स्वतंत्र लढ्यातही सहभाग घेतला. पण स्वातंत्र्या नंतरही आमची अवहेलना थांबलीच नाही. इथलेच जमीनदार, जहागीरदार, वतनदार, राजे हेच खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेत कायदेशीर राजे झाले. आम्ही मात्र परत एकदा दारिद्र्याच्या खायित लोटल्या गेलो. आमच्या वाटेला ७५ वर्षात चांगल जीवनमान सुद्धा आल नाही. आमचा संघर्ष तेल,मीठ, भाजी भाकर च्या पलीकडे कधी जाऊ दिलाच नाही.[ads1]
काही बोटावर मोजण्या इतकी शिकून मोठे झाले पण मात्र ते बोटावर मोजण्या इतकेच आणि कदाचित तेही त्यांच्या पिढीतील पहिलेच असावेत. नव्हे आमच्या पहिल्याच पिढ्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांनी सांगितलेल्या वाटेवर चालत पदवीधर झाले, उच्चशिक्षित झाले. मात्र अजूनही माझा 80% समाज दररोज कष्ट उपसतो. आमच्या घरात अजूनही अठराविश्वे दारिद्र्य आहेच, वरून कितीही चांगले कपडे दिसत असेल तरी आमच्या अंडरपांडीला छिद्र आहेतच, तेच ते बनियान घालून त्यालाही भोक पडलीत, मुलांना चांगले कपडे घालावे म्हणून आजही आमचे बाप फाटकेच कापडे घालतो,[ads2]
आजही आमची माय दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातेच, अजूनही आमचे पोर जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात, अजूनही आमचा शेतकरी बाप शेतीत राब राब राबून शेवटी कर्जाच्या ओझ्याखाली मरतो, अजूनही आमचा कामगार निमूटपणे अन्याय सहन करत कारखान्यात काम करतो. जग डिजिटल झालय म्हणतात पण अजूनही आम्हाला पोटभर अन्न डाऊनलोड करता येईल असे ॲप अजून तरी तयार झालं नाही.[ads3]
आमच्या शेतकऱ्यांवर, कामगारांवर दररोज अन्याय होतो, आम्हाला दररोज हिनपणाची वागणूक मिळते. यांची विकृत मानसिकता आम्हाला माणूस म्हणून घ्यायलाही तयार नाही, यांना अजूनही वाटते आम्ही यांची गुलामीच करावी, यांना अजूनही वाटते आम्ही यांच्याकडे सालानेच काम करावं. यांना वाटते की आम्ही शिकुच नये, यांना वाटते आम्ही फक्त यांच्या हातचे बाहुले बनावे. तरी बरे झाले आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाच राज्य आहे, नाहीतर यांनी आम्हाला खायलाही मिळू दिले नसते.[ads4]
आज प्रत्येक क्षेत्रात आमच्यावर अन्याय होतो. अत्याचार होतो. कधी डायरेक्ट होतो तर कधी इनडायरेक्ट होतो. कधी आम्हाला कळतो तर कधी कळत नाही. पण आम्ही मात्र कधीच पेटून उठत नाही. निमूटपणे सहन करतो आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार. शेवटी नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. पण खरंच नशीब असते का हो ? आणि असेल तर मग आमच्याच वाटेला दरिद्रच का ? याचा जाब आता आम्ही व्यवस्थेला विचारला पाहिजे. नशीब पेक्षा आम्ही मनगटावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. स्वतंत्र मिळून ७५ वर्ष तर महाराष्ट्र राज्य स्थापन होऊनही ६२ वर्ष उलटली. पण अजूनही आम्ही जीवनावश्यक गोष्टीसाठी झटतोय. अजूनही आम्ही या व्यवस्थेचे जणू भागच नाही. इथली जातीवादी मानसिकता आम्हाला मानव म्हणून घ्यायलाही तयार नाही. मग सत्तेत आणि व्यवस्थेत वाटा देणे खूप दूरच राहिले. मात्र हे चित्र आता बदलायलाच हवे. या व्यवस्थेविरोधात आम्ही लढायला हवं.[ads5]
आमचे बाबासाहेब सांगायचे की “अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो.” त्यामुळे आता अन्याय सहन करणे सोडलाच पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलच पाहिजे. या देशाच्या प्रत्येक साधनसंपत्तीत, नैसर्गिक संपत्तीत प्रत्येकाचा समान हक्क, अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने मिळवलाच पाहिजे. हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्याच पाहिजे.[ads1]
इथला जातीवाद संपणारच नाही, कायद्याने जरी जातीयवादाला थारा नसला तरी या लोकांच्या सडेल मानसिकतेतून जातीयवाद कधीच संपणार नाही. तो आम्हाला प्रत्येक ठीकणी कोण्या ना कोण्या रूपाने त्रास देतच राहणार. परंतु आपण मात्र माणसाला माणूस म्हणूनच समजणाऱ्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांनी सांगितलेल्या समतेच्या मार्गानेच गेलं पाहिजे. आपल्या सोबतच इतरांच्या हक्कासाठीही लढल पाहिजे. धर्माच्या, जातीच्या नावे राज्य करणाऱ्या बाजार बुनग्यांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता आपण घडवलाच पाहिजे. कोणाच्या धार्मिक प्रश्नासाठी लढण्यापेक्षा आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढलचं पाहिजे.
लक्षात ठेवा आज लढले नाही तर उद्याचे भविष्य अंधकारमय असेल
जय जिजाऊ जय शिवराय
जय जोती जय क्रांती
जय भीम जय संविधान
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक [author title=”प्रविण जगन्नाथ बोचरे ” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/05/IMG_COM_20220501_1045_09_3361.jpg”]संपादक क्रांतीसुर्य न्यूज 9604295891[/author]
खुपच छान
मार्मिक भाष्य केले आहे
इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला याची जराही किव येत नाही