अहिंसा उत्सवास लाखनवाडा येथे मोठा प्रतिसाद
गांधींनी देश निर्मितीचा पाया रचला :अरविंद शिंगाडे

लाखनवाडा दि २६ -अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा देत गांधीजींनी सक्षम भारताचा पाया रचला, ज्यावर आजचा मजबूत भारत उभा आहे असे वक्तव्य प्रसिद्ध साहित्यक अरविंद शिंगाडे यांनी केले . ते लाखनवाडा येथे आयोजित अहिंसा उत्सवामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
‘अहिंसा के रास्ते ‘ या कार्यक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात अनेक ठिकाणी अहिंसा उत्सवाचे माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . त्यानिमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचारांवर आधारीत लोकसंवाद व व्याख्यान आयोजित केले आहेत . त्या निमित्ताने आज दि. 26 जानेवारी ला लाखनवाडा ता. खामगाव येथे गांधीजींच्या विचारावर लोकसंवाद व व्याख्यानाचा कार्यक्रम सुप्रसिद्ध विचारवंत अभियंता विजयराव पांढरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला .
कार्यक्रमाला खामगाव मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील , महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण , अहिंसा उत्सवाचे आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनु. जाती विभागाचे सरचिटणीस गौतम गवई , काँग्रेस किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष अतुल सिरसाट , खामगाव पं स चे माजी उपसभापती अंबादास वानखडे , तंटामुक्ती अध्यक्ष अजीम खान , डॉ सतीष खडसे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती
गांधीजी हे युवकांचे उर्जास्त्रोत आहेत, युवकांनी त्यांना वाचुन समजून घ्यावे असेही ते पुढे बोलताना म्हणाले . या देशाची जडणघडणच गांधी, नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असून त्यांच्या कार्यामुळेच आज धर्म,भाषा,संस्कृती मध्ये विविधता असतांनाही जगातील सर्वात मोठा लोकशाही देश एकसंधपणे वाटचाल करीत आहे, असेही अरविंद शिंगाडे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. याप्रसंगी संविधान प्रस्तावना वितरित करण्यात आल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये अहिंसा उत्सवाचे आयोजक अजय तायडे यांनी आयोजनाबाबत भुमिका मांडली . यावेळी ज्ञानेश्वरदादा पाटील , तेजेंद्रसिंह चव्हाण , गौतम गवई यांनीही विचार मांडले . गांधी मरत नाही हे पुन्हा या आयोजनाने सिध्द झाले ,असून गांधी समजणे सोपं नाही तरीही युवकांनी गांधी समजून घ्यावा, असे आवाहन विजयराव पांढरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले . कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन या उत्सवाचे संयोजक डॉ गुफरानखान , राजुभाऊ राठोड , गणेश इंगळे यांनी केले .
कार्यक्रमाला माजी उपसरपंच विलास पाटिल , लाखनवाडा खु तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील,अशोक तायडे , अँड शहेजादउल्लाखान , पंडीत शेळके , देवानंद बोचरे , प्रल्हाद हटकर , मधुकर वाकोडे , अनिल मारकड , शेख सलीम , घारोड चे माजी सरपंच मो. रईस , चिंचपुर चे उपसरपंच रफीक शाह , चव्हाण साहेब पोलीस पाटील चिंचपुर , गवंढाळा येथील ज्ञानेश्वर इंगळे , अनील पांढरे श्रीकांत काळे आसा येथील सुनिल पाटील , गणेश इंगळे , बोरीअडगाव येथी सा हील सुरवाडे , पत्रकार सचिन बोहरुपी , पुरुषोत्तम मेतकर , हाजी सुभान खान , याया खान साहेब यांच्यासह लाखनवाडा पंचक्रोशीतील गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच प्रकाश इंगळे यांनी केले तर आभार गणेश वानखडे यांनी मानले .