राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने प्रा हरी नरके यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण

कळंब – जि.धाराशिव दि.9 | जेष्ठ विचारवंत, अभ्यासू वक्ते, ओबीसी च्या हक्कासाठी अविरत झुंज देणारे लढवय्या व्यक्तीमत्व, महात्मा फुले यांच्या विचाराची ओळख करून देत संशोधन करून महात्मा फुले, सावित्रीमाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेखक प्रा हरी नरके यांचे अकाली निधन झाल्याचे समजताच बहुजन वर्गात दुःखाची लाट पसरली आहे.
ओबीसी सह बहुजन समाज हरी नरके यांच्या विचारला पारखा झाला आहे.त्यांच्या प्रती संवेदना प्रकट करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या वतीने कळंब शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शोकसभेचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, सचिन डोरले, यांनी केले. यास शहरातील विविध मान्यवर व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यामध्ये प्रा.घाडगे सर, प्रा.खांडके सर, डि के .वाघमारे, लेखक के व्ही सरवदे सर, आण्णा भडंगे काका,बं डु आबा ताटे, महादेव महाराज आडसुळ, समता परिषद तालुकाध्यक्ष प्रा राजेंद्र खडबडे, जेष्ठ मार्गदर्शक टी.जी.माळी, पत्रकार माधवसिंग रजपुत, विशाल वाघमारे सर, सचिन डोरले, तालुकाध्यक्ष आशोक शिंपले, भारत शिंदे, अरुण माळी, गणपत तपिसे,नि लेश पाचांळ, मुकेश वाघमारे सर, अशोक चिचंकर, रामदास गोसावी,र सुल खान, विनोद रणदिवे, शहाजी गोडसे, राजाभाऊ ईटकर, आरबाज पठाण, यशवंत हौसलम, सी.टी.तांबडे, राजाभाऊ वाघमारे इत्यादी उपस्थित होते.