आपला जिल्हा

ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित मंत्रालयावर विराट मोर्चास बहुसंख्येने उपस्थित रहावे

जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने यांचे आवाहन

कळंब ता ११ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयासमोर होणाऱ्या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत आहेत.या मोर्चास धाराशिव जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने यांनी केले आहे.

दिनांक 15 मार्च 2023 बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालयासमोर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.ओबीसी समोरील अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र धारकांना सरसकट फीस माफ करण्यात यावी, महाजोतीला भरघोस निधी देण्यात यावा, सर्व विभागीय ठिकाणी महाज्योतीची कार्यालय स्थापन करण्यात यावी, बिहार प्रमाणे राज्यातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी यासह अनेक प्रश्न घेऊन मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

त्यानंतर दुपारी दोन वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार असून राज्याचे सहकार व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचाही सन्मान या अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे.

तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधकार्यकर्ते यांनी या अधिवेशनास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने, राज्य उपाध्यक्ष श्री सुखदेव भालेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष श्री सुहास दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक हजारे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल जाधव ,अनंत फुलसुंदर, केशव काळे,सतीश जाधवर, दिगंबर हुंडेकरी, सचिन राऊत,परमेश्वर साखरे, वेंकट क्षीरसागर, संजय खंडाळकर, कल्याणी सुतार, मच्छिंद्र बोडके राजेंद्र लोहार, बालाजी माळी, राजेंद्र चौरे, अमोल कुंभार, अशोक शिंपले, भास्कर कांबळे, सखाराम शिंदे, संजय क्षीरसागर , बाळासाहेब कांबळे, हरीदास सुतार, विजय माळी, शिशुपाल पुरी, तानाजी तरंगे, आबासाहेब माळी इत्यादींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button