गुलामगिरी पुस्तक वाटप करून अ.भा.माळी महासंघातर्फे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा.
नाशिक(संतोष पुंड) – दि- 24 | सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त अखिल भारतीय माळी महासंघ, नाशिक शहर वतीने गुलामगिरी पुस्तक वाटप करुन साजरा करण्यात आलाा. सत्यशोधक विचारांचा वसा बुद्धिजीवी वर्गाने आत्मसात करावा तथा येणारा समाज स्वाभिमानी बनावा. प्रयत्नवादी विज्ञानाची आस धरावी हा चंग सत्यशोधक शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिनी करण्यात आला.
अ.भा.माळी महासंघच्या वतीने गणेशवाडी, नाशिक येथील बाबासाहेब आंबेडकर याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या जगातील पहिला महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त राजाभाऊ काठे, शहराध्यक्ष विलास वाघ, माजी सरचिटणीस अंबादास शेळके , सोशल मिडिया प्रमुख संतोष प पुंड, नाशिक जिल्हा अध्यक्ष मंगलाताई जाधव , निलिमा माळी , कल्पना गांगुर्डे , शितल शिंदे , शंतनु शिंदे, गणेश खोडे, विनोद डोखे, रविद्र पेहरकर, भरत जाधव, नाना नाईकवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.