राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याराणी होळकर,ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले,माता रमाई यांच्या प्रतिमेची स्थापना
प्रकाश दिलवाले यांचे परीवर्तन वादी विचारांचे तालुक्यात कौतुक
पैठण – दि. 04 |आज जेष्ठा गौरी आगमन सर्वत्र उत्साहात सुरु आहे. सर्वत्र आगमनाची धूमधाम चालु आहे. पारंपारीक पध्दतीने घराघरात गौरी स्थापनेची लगबग सुरु असतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रकाश उत्तमराव दिलवाले यांच्या घरात मात्र स्त्री जिवनाला सती, कर्मकांड, समाजातील दुय्यम स्थान, पुरुषांच्या लेखी हीन दीन असलेल्या, पतित अवस्थेतील स्त्रीयांना सन्मान, शिक्षण, अधिकार, पुरुषांच्या बरोबरीने समाजातील स्थान निर्माण करुन देणार्या परिवर्तनवादी स्त्री उध्दारक खर्या अर्थाने स्त्रीयांना लक्ष्मीचा दर्जा व आदर निर्माण करुन देणार्या लक्ष्मींचे आगमन झाले आहे.[ads1]
प्रकाश उत्तमराव दिलवाले हे आनंदपुर, पैठण येथिल त्यांनी स्त्री जीवनाच्या उध्दारक, आदर्श असलेल्या राजमाता जिजाऊ, राजमाता अहील्याराणी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांची स्थापना करीत स्त्रीयांचे जीवनमान उंचवणार्या, स्त्री जीवनाला अर्थ निर्माण करुन देणार्या महालक्ष्मींची स्थापना केली आहे.
जागृक नागरीक दिलवाले परिवाराच्या या परिवर्तनवादी भुमिकेचे कौतुक करीत असुन स्वतः याच परिवर्तनवादी महालक्ष्मी स्थापनेचा आदर्श राबविण्याचा निश्चय व्यक्त करीत आहेत.
खऱ्या सरस्वती, महालक्ष्मी, दुर्गा या राजमाता जिजाऊ, राजमाता अहील्याराणी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाईं फुले, माता रमाई याच आहेत.महीलांनी या सर्व महान युगप्रवर्तक देवींचे उपकार स्मरण करुन यांना वंदन केले पाहीजे. यांच्या कार्यामुळेच आजच्या स्त्रीयांना सन्मानपूर्वक जिवन लाभलेले आहे. त्या कृतज्ञतेनेच्या जाणीवेतुनच आम्ही दिलवाले परिवार राजमाता जिजाऊ, राजमाता अहील्याराणी होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या महालक्ष्मीची स्थापना करतो, असे प्रकाश दिलवाले व परिवार यांनी सांगितले.