सातपूर येथे अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचा समता मेळावा उत्साहात संपन्न
सातपूर – दि. 16| येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे समता मेळावा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तसेच समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून व महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. नाशिक शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषेदेचे जाळे सातपूर परिसरात मजबूत करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब कर्डक उपस्थित होते,[ads1]
यावेळी नवनिर्वाचित नाशिक शहर अध्यक्षा सौ. प्रा.कविता ताई कर्डक व नवनिर्वाचित महिला आघाडी नाशिक शहर अध्यक्षा सौ. आशा ताई भंदुरे यांचा सत्कार समता परिषद सातपूर विभागा तर्फे करण्यात आला. या वेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रदेश उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी समाजाच्या जनगणनेवर व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाची लढाई कायदेशीर रित्या सर्वोच्च न्यायालयात लढन्यासाठी समता परिषद, आदरणीय भुजबळ साहेब, समिर भाऊ भुजबळ व महाविकास आघाडी सरकार यांचे कशा प्रकारे सहकार्य लाभले हे बाळासाहेब कर्डक यांनी सविस्तर रित्या समजाऊन सांगीतले. श्री.बाळासाहेब कर्डक यांनी संघटन मजबूत करण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले.[ads3]
प्राध्यापक कविता कर्डक यांनी आई सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणा बरोबर सामाजिक जबादारी कशी पार पाडली ते सांगितले व महिलांनी स्वावलंबी कसे बनावे यांचे मार्गदर्शन करून त्याना समाज उपयोगी जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.
या वेळी मा.नगरसेवक व सभापती सदाशिव माळी दादा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समता परिषेदेचे श्रीराम मंडळ (मंडलिक), प्रकाश महाजन, मछिंद्र माळी, भारत जाधव, पोपट जेजुरकर, मधुकर मौले, जीवन रायते, दीपक गांगुर्डे, ज्ञानेश्वर महाजन सर, प्रकाश खैरनार, अनिल माळी, सुनील देवरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, भटु महाजन, अनिल नळे, सुभाष देवरे, जीवन अहिरे सर, डॉ. रामकृष्ण खैरनार, समाधान तिवडे, गोविंद माळी, गुलाब माळी, नाना महाजन, प्रभाकर कदम, किरण भिवसने आदि असंख्य समता सैनिक व नागरिक उपस्थित होते.
या वेळी सौ.अनिता महाजन, स्वप्ना माळी, सुवर्णा मंडळ, क्रांती जाधव, सुमनताई तिवडे, सुवर्णा माळी, सरला अहिरे, रंजना मोरे, सुजाता खैरनार, संजीवनी जाधव, मनिषा महाजन, रंजना बोरसे, माया क्षिरसागर असंख्य महिला समता सैनिक, सातपूर विभागातील सर्व ओबीसी बांधव व भगिनी समतेच्या विचारधारेला मानणारे असंख्य समता सैनिक उपस्थित होते.