नामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
आपल्या अनुभव कौशल्याचा नियोजन पद्धतीचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परते मुळे अन्न पुरवठा खाते महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळात उल्लेखनिय कामगिरी करत आहे.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून २०२० मध्ये शासन निर्णयान्वये शिवभोजन योजना सुरू केली आहे, शिवभोजन योजने अंतर्गत रु.१० प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे; शिवभोजन योजनेचे शिवभोजन ॲप्लीकेशन तयार करण्यात आले.
शिवभोजन थाळी शहरी व ग्रामीण भागाच्या प्रत्येक घटका पर्यंत थेट पोहचली असून, ही एकमेव अशी योजना आहे की तिचा लाभ प्रत्येक नागरिकांना होत आहे ही उल्लेखनीय बाब आहे; नाहीतर या अगोदर मागील भाजपा सरकार मध्ये योजना फक्त कागदावरच असायच्या त्या सामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहच होई पर्यंत त्या बंद व्हायच्या.
२०२० मध्ये शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यास शिवभोजन थाळीचा ठराविक इष्टांक देण्यात आला होता, त्यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली असून सद्य स्थितीत शिवभोजन योजनेचा इष्टांक प्रती दिन २.०० लक्ष एवढा आहे; कोरोना काळात एकूण ९१३ नवीन शिवभोजन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून ३८ कार्यरत शिवभोजन केंद्राच्या थाळी संख्येत वाढ करण्यात आली आहे, सद्यस्थितीत राज्यात १.५६५ शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांरीत, बेघर तसेच बाहेर गावचे विद्यार्थी यांच्या जेवणा अभावी हालअपेष्टा होत असल्यामुळे पुरवठा विभाग परिपत्रकान्वये २०२१ पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना ५ ₹ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली, या कालावधीत एकूण ३,६८,१०.७७९ शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत; नंतर शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केल्याने गरीब व गरजू जनतेचे जेवणा अभावी हाल होऊ नये काही महिने लाभार्थ्यांना शिवभोजन थाळी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती.
शिवभोजन योजना चालू झाल्या पासून आत्ता पर्यंत ९,८६,१४, ९४० एवढ्या शिवभोजन थाळचा वितरीत करण्यात आल्या आहेत.
विविध प्रकारच्या योजनेतून अन्न नागरी पुरवठा विभाग गोर गरीब जनतेच्या सकारात्मक कामी येत आहे याचा विशेष आनंद वाटतो, आणि मंत्री महोदय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा विभागाच्या बाबतीत कुठे नागरिकांची गैरसोय होत आहे का या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत असून आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने थेट संपर्क करून त्यांची अडचण सोडवत आहे.
अन्न नागरी पुरवठा खाते अनाथ मुलां साठी शिधापत्रिका धोरण राबवत आहे, त्यात अनाथ मुलांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत २८ वर्षांवरील अनाथांना स्वयंघोषित उत्पन्नाच्या आधारे तात्पुरती बी.पी.एल (पिवळी) शिधापत्रिका वितरीत करून प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत लाभ देण्या बाबत तसेच २८ वर्षा वरील अनाथांना उत्पन्ना प्रमाणे एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील एकुण १२९९ अनाथांना शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत हा उपक्रम राज्यात प्रथमच राबवला जात आहे; दूरदृष्टी ठेवून अन्न पुरवठा विभागात विविध प्रकारच्या योजनेतून विशेष बदल करण्यात आले ह्या बदलांचे आणि लोक उपयोगी धोरणांचे सर्वस्वी श्रेय ह्या अन्न पुरवठा विभागाचे मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना जाते; अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कामात उल्लेखनीय समाज उपयोगी कार्य होत आहे.[author title=”डॉ. कमलेश पैठणकर” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220601-WA0075.jpg”]भुजबळ समर्थक[/author]