आपला जिल्हा

आडनावावरून ओबीसी डाटा बंद करून प्रशासकीय अधिकाऱ्यां मार्फत गोळा करावा – सिन्नर समता परिषद चे निवेदन

सिन्नर, जि- !नाशिक – दि.१५ | ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित आयोग आडनावावरून ओबीसी च इंपरिकल डाटा गोळा करता असल्याने. परंतु बरीच आडनावे ही वेगवेगळ्या जातीत आहेत. तर या विरिदाजत समता परिषद अरज्याबहे आक्रमक झाली असून आज सिन्नर येथे तहीलदारांना निवेदन देऊन वलवावर तीव्र आक्षेप घेतला आहे,

सदर निवेदनात म्हटले आहे की “न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती परंतु आमचे असे निदर्शनास आले आहे की आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आड नावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे.

भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे करिता महोदयांना विनंती की समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासना मार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मा तहसीलदार श्री राहुलजी कोताडे यांना देण्यात आले,

यावेळी राजेंद्र जगझाप, संजय काकड, राजेंद्र भगत, सुभाष कुंभार, कैलास झगडे, डॉ विष्णुजी अत्रे, बंडू नाना भाबड, डॉ संदीप लोंढे, विशाल चव्हाण, लक्ष्मण बर्गे, संतोष पवार, संदीप भालेराव, विजय लव्हाटे, मनोज महात्मे,संजय लोणारे,विलास दराडे,भाऊसाहेब पवार, कैलास गोळेसर, खडूं सांगळे, तानाजी सानप, पुरुषोत्तम भाटजीरे, देवनपल्ली सर, संदीप लोंढे, आकाश विश्वकर्मा, राजेंद्र माळी, महिला आघाडीच्या मेघाताई दराडे, आफरीन सैय्यद, यासह समता सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button