राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले प्रदेश अध्यक्ष नामदार छगनरावजी भुजबळ साहेब
आपल्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार अनुभवतांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्ष स्थापने पासून गेली २३ वर्षा पासून छगनरावजी भुजबळ साहेब ह्या पुरोगामी विचारांचा पक्षात पक्षाच्या केंद्रस्थानी काम बघत आहे, विषेश म्हणजे छगनरावजी भुजबळ हे पक्षाचे पहिले प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहे; सध्या छगनरावजी भुजबळ हे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उद्धवजी ठाकरे यांच्या सरकार मधे कॅबिनेट मंत्री आहेत; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यां पैकी साहेब एक आहेत!
पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष हे पद त्यांनी भुषविले आणि खऱ्या अर्थाने पक्षाचा मूळ पाया मजबूत होण्यास मदत होवून पक्षाची मुहर्तमेढ रोवली गेली; अभिमान ह्याच गोष्टीचा वाटतो की आमचा साहेब ह्या पक्षाचे पहिले प्रदेश अध्यक्ष राहिले आहेत; पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे काम शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर सोपविले, महाराष्ट्रभर फिरुन कार्यकर्त्यांच्या जोरावर साहेबांनी पक्ष वाढवला.
राष्ट्रवादी पक्षाची छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा ही पक्षाचा पाया आहे, तर पक्षातील तरुण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा; आज घडीला पक्षाच्या पुरोगामी विचारधारेवर काम करणारे तरुण कार्यकर्ते ग्रामीण भागा पासून ते शहरी भागा पर्यंत मोठ्या संख्येने आहेत! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून तरुण राजकारणात सक्रिय झाला असून घराणेशाही ला नेहमीच्या त्याचं प्रस्थापीतांना शह देण्या साठी तरुण पुढे सरसावला आहे, तरुणांना संधी म्हणजे राष्ट्रवादी.
सामान्य कुटुंबातील युवकांना पक्षाने आज पर्यंत मोठी संधी दिली आहेत, ह्या पक्षातील नेते कार्यकर्ता घडवणारे नेते असून सामान्य घरातील युवकांना संधी देवून मोठ्या पदावर विराजमान केले आहे.
पक्ष नेत्यांच्या बळावर सत्तेत येतो, पण कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष जिवंत राहतो, विचारांचा निष्ठावंत कार्यकर्ता हा पक्षाचा मूळ पाया आहे; कार्यकर्त्यांच्याच बळावर निवडणूक जिंकता येतात आपल्या नेत्या मागची मूळ ताकद तर कार्यकर्ता आहे; आणि राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा अविभाज्य घटक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राजकारणातील किंगमेकर समजला जातो, हा पक्ष थेट बांधा पर्यंत पोहचलेला पक्ष आहे; शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी यांच्या पाठबळाने ह्या पक्षाने सातत्याने सत्तेत राहून फिनिक्स भरारी घेतली आहे.
पक्षप्रमुख शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात १० जून १९९९ रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजच्या १० जून रोजी २३ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे; महाराष्ट्राच्या सत्तेत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही एका विचारांची स्थापना आहे; राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २३ वा वर्धापन दिन, शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात वटवृक्ष झालेला हा पक्ष आपली राजकीय वाटचाल करत आहे.
सोनिया गांधी यांच्या काँग्रेस मधील उदया नंतर आपली स्वतःची वेगळी पाऊलवाट चालत शरदचंद्रजी पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २३ वर्षे पूर्ण झाली असून, २४ व्या वर्षात पदार्पण होत आहे.[ads1]
स्थापने पासून सत्तेत कायम वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जडणघडण झाली छगन भुजबळ यांच्या प्रदेश अध्यक्ष पदापासून, भुजबळ साहेबांच्या राजकीय तालमीत पक्षाला हाडाचे कार्यकर्ते मिळत गेले.
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या काही दशकां पासून शरद पवार या नावाचा दबदबा कायम आहे, राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वी पासून आहे; शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता, तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं; शरद पवारांच्या या पत्रा नंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकी नंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.[ads2]
काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्या नंतर शरद पवार साहेब यांनी आपल्या सोबतच्या सहकारी यांच्या पाठबळा ने व बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी.एम.संगमा यांच्या साथीने सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती; मुळ विचारधारा काँग्रेसची असल्या मुळं आपण आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावं असं ठरलं! पक्षाचे पहिलं अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु झाली.
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्या नंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या या निवडणुका नंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस सोबत सत्तेत आला; पक्षाच्या २३ वर्षांच्या इतिहासात हा पक्ष फक्त ५ वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.
२०१४ मध्ये महाराष्ट्रासह देशभरात एका लाटेच्या तडाख्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ते बाहेर जावं लागलं, लोकसभेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता; मात्र २०१९ च्या विधानसभा निवणडणुकीत हे चित्र पालटले.[ads3]
२०१९ मध्ये भाजपा शिवसेना महायुतीचा रथ रोखणे अवघड असताना, राष्ट्रवादीनं निकरानं लढा दिला, साताऱ्यातील पावसातील वादळी सभेनं राष्ट्रवादीला एक नवी उर्जा दिली!
विधानसभा निकाला नंतर राज्यात सत्तांतर झाले या नंतर शिवसेना आणि काँग्रेस या भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती; राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात!
शिवसेनेला महायुतीतून बाहेर घेऊन उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री करणे इथपर्यंत… शरद पवारांनी राजकीय डावपेच यशस्वी करून दाखवले आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २३ वर्ष पूर्ण होत असून पक्षात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले आहेत; पुढील काळात नवं युवकांच्या बळावर आपलं अस्तित्व राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पु:न्हा युवकांना संधी देतो की काय?यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.[ads4]
सामान्य कुटुंबातील कित्येक युवकांना विविध पदावर पोचवणारा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा पुरोगामी विचारांचा कृतीशील पक्ष म्हणजेच पवार साहेबांच्या बुलंद नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष!
आज या पक्षाचा २३ वा वर्धापन दिन, खरं तर आदरणीय पवार साहेबांनी आपली उभी हयात ज्या काळ्या मातील वैभव प्राप्त करून देण्यासाठी घालवली त्याच काळ्या मातीची अहोरात्र सेवा करणाऱ्या बळीराजा, शेतकऱ्यांच्या हिताचा, महिलांच्या विश्वासाचा सर्वसामान्यांच्या हक्काचा शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या पुरोगामी विचारांचा कृतीशील पक्ष म्हणजेच आपला पक्ष.
आज या पक्षाचा २३ वा वर्धापन दिन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना व पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.[author title=”डॉ. कमलेश पैठणकर” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220601-WA0075.jpg”]भुजबळ समर्थक[/author]