माळी समाज राज्यस्तरीय बैठक पुणे येथे उत्साहात संपन्न
पुणे- दि. 05 | महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची महाबैठक दि ४ रोजी पुणे येथे तळेगाव ढमढेरे येथे मोठया उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी माळी समाजातील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी नंदाताई भुजबळ यांची महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल व राष्ट्रीय पुरस्कार विजेते मनोज गुंजाळ यांचा सन्मान समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.या बैठकीमध्ये माळी समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बरोबरच इतरही समाज हितासाठी आगामी काळात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
आगामी सर्व निवडणूका लक्षात घेता. संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात माळी समाजाचा टक्का वाढविण्यासाठी समाजातील तळागाळातील माळी समाज बांधवांचे संघटन बांधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असे सर्वानुमते ठरले आहे. माळी समाजावर सर्व राजकीय पक्ष नेहमीचं अन्याय करत आहे. राज्यात माळी समाजाची प्रत्येक मतदार संघात निर्णायकारक लोकसंख्या आहे. तरी सुद्धा खुप जिह्ल्यात माळी समाजाचा एकही आमदार – खासदार हा का नाही ? हे माळी समाजाचे दुर्दैव आहे. यासाठी आप-आपसातले हेवे-दावे, स्थानिक वाद-विवाद बाजूला सारून समाजाने एकत्र येणे हि काळाची गरज आहे असा सर्वांचा सुरु होता.
महेश भाऊ गोरे यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगतिले की, समाज संघटन हाच विकासाचा पाया आहे. अगोदर आपले योग्य पद्धतीने समाज संघटन करा एकत्रित या तळागाळातील समाज बांधवाच्या संकटकाळी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धावूंन जा समाजातल्या प्रत्येक माणसा सोबत आपुलकीचा जिव्हाळा निर्माण करा.त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा.प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात विखुरलेल्या माळी समाजाला एकत्र करा. महात्मा जोतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजवा. फुलेंच्या विचारांचा समाज घडवा. जिह्ल्यातील राजकीय पुढाऱ्यांनी माळी समाजाला कमी लेखू नये. येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकीत माळी समाजाचा विचार करणाऱ्या पक्षालाच समाजचे मतदान मिळेल.
ॲड, नितीनजी राजगुरू साहेब यांनी पुणे येथील भिडे वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावा नाहीतर लवकरच माळी समाज राज्यव्यापी आंदोलन पुकारल्याशिवाय रहाणार नाही. तसेच समाज हिताचे ठराव एकमताने पास करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात समाज संघटनेसाठी अधिक लक्ष देणार व जिह्ल्यात माळी समाजाचे कॅडर तयार करून कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण देणार व सर्व कॅडर बेस कार्यकर्ते जिह्ल्यासह महाराष्ट्र भर तयार करणार. असे यावेळी रूपाली ताई रायकर व राजेंद्र गोरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी मुरलीधर भुजबळ, रूपेश नेरकर, वर्षा ताई भोंग, उमेश गायकवाड, वैशाली सिनलकर, ओंकार एकशिंगे, स्वप्नाताई लोणकर, यांनी ही आपले मत व्यक्त केले.
यावेळी माळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक मुरलीधर नाना भुजबळ, ॲड नितीनजी राजगुरू, महेश भाऊ गोरे,रूपालीताई रायकर, राजेंद्र गोरे, ज्ञानदेव शिंदे, संजय जकाते, रूपेश नेरकर, प्रितम खेरडे, उमेश गायकवाड, नंदाताई भुजबळ, मनोज गुंजाळ, गणेश ताजणे, कविता ताई जकाते, वर्षाताई भोंग, स्वप्नाताई लोणकर, वैशाली सिनलकर, सीमाताई पांढरे, मंदाकिनी कळमकर, भारतीताई आल्हाट, ॲड प्रमिलाताई चवरे, जयश्रीताई रासकर, गणेश गायकवाड, कुणाल भुजबळ, किरण वाघ, शेखर क्षिरसागर, विधाते साहेब, शैलेश जाधव, ओंकार बिरदवडे, शुभम खेडकर, लक्ष्मण सुडे, सोमनाथ माळी, बापूसाहेब बोराटे, उमेश तोडकर, भानुदास आल्हाट, जालिंदर पिंगळे, राजाभाऊ लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब झगडे, महादेव शिंदे, तेजस हेगडे, लक्ष्मण शिंदे, सुनिल बनसोडे, बंडू जाधव, सुनिल जाधव, तुलजाराम भास्कर, गणेश म्हेत्रे, प्रदिप देवकर, अनिकेत अदलिंगे, राहूल वसेकर,दादा माळी, आदी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महाबैठकीचे प्रास्ताविक संजय जकाते साहेब यांनी केले तर सूत्रसंचालन बापूसाहेब बोराटे यांनी केले. अतिशय खेळी मेळीच्या वातवरणात बैठक संपन्न झाली. शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली..