स्वाभिमानी नेतृत्व- मा.खा.समीरभाऊ भुजबळ
विकासाचा ध्यास घेऊन चालत असलेलं छगनरावजी भुजबळ साहेब यांचा राजकीय वारसा घेऊन साहेबांच्या तालमीत तयार झालेलं युवा पर्व समीरभाऊ भुजबळ यांची ओळख नाशिक जिल्ह्याचा खासदार म्हणून कायम आहे.
नाशिक जिल्ह्याचा सक्षम खासदार म्हणून जरी ओळख असली तरी विकासाच दुसरं नाव म्हणून नाशिक देखील समीरभाऊ भुजबळ यांचं नाव कधी विसरू शकणार नाही,विकासाची शपथ घेवून राजकारणात दमदार वाटचाल करत समाजातील वंचित,पिडित घटकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक धडपड करणारं स्वाभिमानी नेतृत्व म्हणून समीरभाऊ भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं.
लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सक्षम राजकीय वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात असताना राजकारणा पलीकडे शैक्षणिक क्षेत्रात देखील अव्वलस्थानी असलेले खा.समीर भुजबळ हे विकासरत्न आजही जनतेच्या मनात आमचा खासदार म्हणून कायम आहे.
राजकीय झुंज तशी संघर्षाचीच! जनतेच्या मनात असलेली विकास आणि समीरभाऊ ही प्रतिमा कायम ठेवत,आलेल्या प्रत्येकाला न्याय कसा मिळेल ह्या साठी चालू असलेली धडपड नेहमीचं भाऊंची प्रामाणिक असते!
संकटकाळी नाशिकच्या जनतेच्या अडी अडचणीला धावून जाणारं, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून ही त्यांचे कडे पाहिलं जातं; खासदार म्हणून दिल्लीत काम करताना ओ.बी.सी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी यशस्वी पणाने हाताळला; स्व:कर्तृत्वाने नाशिकच्या मनातला खासदार ही पदवी आजही समीर भुजबळ यांच्याच नावावर आहेत; खासदार असताना आपल्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ त्यांनी गोरगरिबां पर्यंत पोहचवीलाचं; परंतू त्याच बरोबर अनेक नव नवीन योजना अंमलात आणून लोक कल्याणाची एक अनोखी संकल्पना त्यांनी रूजविली, सत्तेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवल्याने त्यांना नाशिक जिल्ह्यात अफाट लोकप्रियता मिळाली; ज्यामुळे अनेकांची पोट दुखली!सोबतच कट कारस्थानांच्या राजकारणातुन त्यांची प्रतिमा हनन करण्याचा डाव पारंपारिक विरोधकां कडून रचला गेला, परंतु प्रत्येक विजयात संघर्ष आणि प्रत्येक संघर्षात विजय हे समिरभाऊ यांच्या यशाचं समीकरण; लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून शिकवण व संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी नाशिक जिल्ह्यात आपल्या राजकीय करिअर मध्ये पाहिल्याचं टर्म मध्ये खासदार ह्या पदाला गवसणी घातली व मोठ्ठा विजय मिळवला.
वंचित,शोषित,बहुजनांच्या हितासाठी समीरभाऊ यांचा अखंड प्रवास चालू आहे; विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या समीरभाऊ भुजबळ यांच्या कामाची पद्धत ही इतरांन पेक्षा नक्कीच वेगळी आहे, संकटांना न घाबरता त्यावर उपाय काय सुचवता येईल ह्या कडे लक्ष देवून त्या समस्या अंतिमतः निकाली काढण्याची पद्धत भाऊंची उल्लेखनीय आहे, त्यांचा सुरु असलेला हा रणझुंजार प्रवास झपाट्याने वाढत होता त्यांचा राजकीय प्रवास रोखण्याचा अनेक राजकीय महारथींनी प्रयत्न केला आजही सुरू आहे, परंतु संघर्षाची शिकवण व जनसामान्यांचे असीम पाठवळ लाभल्याने त्यांना रोखणे कुणालाही शक्य झाले नाही, तसे पाहिले तर स्वाभिमानी नेतृत्व ते नाशिकच्या विकासाचे शिल्पकार या प्रवासात त्यांचा राजकारणाचा आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे; पहिल्यांदा खासदार झालेल्या समीर भुजबळ यांनी दिल्लीचा कोणताही अनुभव नसतांना अतिशय यशस्वी पणे काम सांभाळले.[ads1]
राष्ट्रवादी पक्ष स्थापने पासून पक्षाच्या छोट्या मोठ्या कामात त्यांची भूमिका नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे, पक्ष नेतृत्वाने त्यांच्या वर जबाबदारी सोपवली ती देखील यशस्वी रित्या सांभाळत त्यांनी तरुणांचे मोठ्ठ जाळं उभ केले; मागील काही दिवसा पूर्वी त्यांच्या नेतृत्वा खाली ओ.बी.सीं च्या प्रश्नांवर राज्यभरात समता परिषदेच्या माध्यमातून ओ.बी.सीं चे राजकीय आरक्षण पूर्वरत झाले पाहिजे ह्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते; तेव्हा देखील समीरभाऊ भुजबळ ओ.बी.सी च्या न्याय हक्का साठी दिल्लीत तळ ठोकून होते.
समीरभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली समता परिषद च्या माध्यमातून विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाली; समाजातील वंचित पिडित घटकांच्या सेवेसाठी लोकनेते भुजबळ साहेब यांच्या प्रमाणेच समीरभाऊ भुजबळ यांनी स्वतःला ओ.बी.सी च्या न्याय हक्कासाठी झोकून दिले आहेत.[ads2]
हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा ध्यास घेत येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत अविरतपणे वाटचाल करणारं हे धुरंधर नेतृत्व, त्यांची कारकिर्द सुरवाती पासून ते आता पर्यंत मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग समाजाच्या भल्यासाठीच राहिली आहे.
एक निर्भय राजकारणी अशी त्यांची ओळख राहिली आहे; ओ.बी.सी राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणूका होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेऊन आपल्या समाजाच्या पाठीशी ठाम उभे राहिलेत.
आपल्या खासदार कार्यकाळात त्यांनी केवळ रस्ते, इमारतीच बांधल्या नाहीत तर शहर कसं असावं? यांचं रोल मॉडेल महाराष्ट्राला घालून दिलं, अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांना मदत, बेरोजगारांना नोकऱ्या ह्या साठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिलेत; एवढेच नव्हे तर कोरोना संकटात गोरगरीब,गरजू नागरिकांना घरपोच रेशन जीवनावश्यक साहित्य वाटप केले; भव्य कोविड सेंटर उपलब्ध करून सामान्य नागरिकां साठी कोविड काळात मोठ्ठं काम उभं केले.[ads4]
विशेष म्हणजे नाशिक येथे साहित्यसंमेलन भरवून ते यशस्वी रित्या पार पाडून आपल्या नियोजन पद्धतीचा व कार्याचा आदर्श महाराष्ट्राला त्यांनी घालून दिला, माणसं जोडण्याचा सक्षम वारसा त्यांनी आजही कायम जपला आहे; आपल्या कामांतून त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले! समाजातील जातीभेद झुगारून एक माणूस म्हणून विविध घटकांना आपुलकीने जोडण्याचे काम केले हे स्वाभिमानी नेतृत्व पुन्हा तितक्याच रूवाबात नाशिक चा खासदार म्हणून तरुणांना पहायला आवडेल.[author title=”डॉ. कमलेश पैठणकर” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220601-WA0075.jpg”]भुजबळ समर्थक[/author]