आभाळाएवढी ‘(1981)(सावित्रीबाईफुले ) या चरित्रात्मक कादंबरीतील समाजदर्शन-डॉ. नूतन लोणकर नेवसे
नायगाव तालुका -खंडाळा जिल्हा सातारा. जे जे लिखित ते ते सर्व साहित्य असते. साहित्यात समाज हा येतच असतो. साहित्य व समाज यांचा परस्परसंबंध असतो. साहित्य ही एक सामाजिक संस्था आहे व समाज निर्मित भाषा हे त्याचे माध्यम आहे लेखक,वाचक व भाषा साहित्य कृती च्या संदर्भात महत्वाचे घटक आहे .”समाजाच्या वाटचालीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक युगाचे स्वतःचे असे एक खास ध्येय वा सूत्र असते, ते त्या काळात निर्माण होणाऱ्या साहित्यात आपोआप प्रतिबिंबित होत जाते.
” साहित्य व समाज यांचे जे सहसंबंध आहे त्याला हिंदुराव गोविंद बनसोडे यांची आभाळाएवढी ही चरित्रात्मक कादंबरी देखील अपवाद नाही या कादंबरीमधील समाज एकोणिसाव्या शतकातील आहे ही कादंबरी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक कादंबरी आहे या काळात अस्पृश्यता जातीय विषमता पाळली जात होती स्त्री शिक्षणावर बंदी होती चार भिंतीच्या आतच स्त्रीला स्वातंत्र्य होते त्या काळात एक स्त्री म्हणून सावित्रीबाई फुले यांनी जे सामाजिक कार्य केले ते परिवर्तनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काम आहे.
स्त्रीच्या भाव भावना कोणी समजून घेत नसे. केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जात असे. शिक्षण घेणे तर दूरची गोष्ट होती. अशा प्रकारची समाजव्यवस्था होती या समाजव्यवस्थेचे चित्रण करण्यात हिंदुराव गोविंद बनसोडे यांची आभाळाएवढी कादंबरी तरी कशी अपवाद असेल या कादंबरीमध्ये ज्या स्त्रिया आलेल्या आहेत, त्यामध्ये सावित्रीबाई फुले, सीता, सगुणाबाई क्षिरसागर( माई), राधा लोखंडे लक्ष्मीबाई इत्यादी स्त्रिया आहेत.
समाजव्यवस्थेमध्ये वावरताना जे अनुभव आले ते कादंबरीत आले आहेत उदाहरणार्थ सावित्री चे वय नऊ वर्षाचे असताना तिचा विवाह जोतीरावांबरोबर केला. म्हणजे ती वयाने लहानच होती लहान वयात लग्न केल्यामुळे तिला घरात मिसळायला वेळ लागला माहेरच्या माणसांच्या आठवणीने ती रडू लागली सावित्री चे लग्न तरी त्यामानाने उशिरा झाले पण “काही लोक पाळण्यातल्या पोरापोरींची लग्न करतात. ” असे गोविंदराव फुले म्हणतात.
तसेच सगुणाबाई क्षिरसागर आपल्या जीवनाची वाताहत सांगतात “सा वर्षची असताना लगीन झालं हडपसरला दिली. त्यो नवरा मेला फुरसुंगी ला आई बापाच्या घरी गेले. त्येबी मेल. आय-बाप, नवरा मारणारी म्हणून पांढर्या पायाची मी ठरले. मी रोज मरान जगू लागले. कुणी आधार दिला न्हाय. मग दुसर लगीन केल. त्येबी मेला. ” म्हणजेच लहान वयात लग्न होऊन कुटुंबात देखील स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते तिलाच दोष दिला जातो. तिच्या मुळे सर्व काही वाईट गोष्टी होतात, अशी समाजाची व कुटुंबाची धारणा असते पण स्त्रीच्या भाव भावनांकडे कुणाचे लक्ष नसते म्हणजे तीची कुटुंबात देखील पिळवणूक होतेच, तशीच समाजात देखील होते आणि तिच्या नवऱ्याकडून देखील होताना दिसते.
तसेच ब्राह्मण समाजामध्ये जन्मलेल्या विधवा काशीबाई या दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून गरोदर राहिल्या व जीव देणार इतक्यात योगायोग म्हणजे महात्मा फुले फिरावयास गेले असता त्यांचे लक्ष पांढरे पातळ नेसलेल्या व काहीतरी विचित्र हालचाल झालेल्या काशीबाई कडे गेले तत्कालीन परिस्थितीची फुल्यांना कल्पना होती क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी काशीबाईला जीव देण्यापासून परावृत्त केले व आधार देऊन घरी घेऊन आले घडला प्रकार समजून घेतला यावरून त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी होती याची कल्पना येते काशीबाई सारख्या हजारो बाल विधवांचे जीवन कसे उद्ध्वस्त होत होते याची कल्पना येते तसेच विधवा स्त्री म्हणून पांढरे पातळ ही तिची वेशभूषा ठरलेली. तिला मंगल कार्यात, धार्मिक कार्यात स्थान नाही. तिने घरातून बाहेरच निघायचे नाही ,अशी व्यवस्था कुटुंबात समाजामध्ये होती तिच्या भावविश्वाचा कोणी विचार देखील करत नसे.[ads1]
तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये नवविवाहित स्त्रीला मूल होणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई मात्र स्त्रीला मुल झाले नाही तर तिच्या पतीला दोष देण्याऐवजी सगळा दोष हा स्त्रीला दिला जात असे त्यात सावित्रीबाई देखील अपवाद नव्हत्या समाज व्यवस्थेने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला सावित्री ज्योतीच्या सत्कार समारंभाला विश्रामबाग वाड्यात जात असताना बायकांची कुजबूज चालली होती शिक्षण नसल्यामुळे अज्ञान असलेल्या बायका सावित्रीला मुल नसल्यामुळे बोलतात. “ज्येला फळ न्हाय ते झाड न्हाय, आन जिला फूल न्हाय ती वेल नाही. तेच खर” येथे सावित्रीच्या भावना दुखावतात सावित्रीला फार वाईट वाटते पण कुठलेही कारण समजून न घेता समाज हा स्त्रीलाच दोषी ठरवतो महात्मा फुले यांनी दुसरे लग्न करावे यासाठी समाज त्यांना प्रवृत्त करतो यावरून असे लक्षात येते की स्त्रीच्या भावभावनांचा विचारांचा तिला काय वाटते तिची मानसिकता याचा विचार समाज करत नाही ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकात अस्तित्वात होती त्याकाळच्या समाजव्यवस्थेमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा शुभ कामासाठी स्त्रीने येणे म्हणजे अभद्र मानले जाई त्याला सावित्रीबाईंची मानसिकता देखील अपवाद नव्हती महात्मा फुले यांचा सत्कार विश्रामबाग वाड्यात होणार याचा आनंद सावित्रीला झाला पण” तो भाग्यवान सोहळा बघायचं भाग्य आमच्या नशिबी नाही येथे कोणतीही स्त्री येणार नाही मग मीच एकटी कशी येऊ”! कुठलीही स्त्री ही सत्कार समारंभ सोहळ्याच्या ठिकाणी जात नसे तिथे फक्त पुरुषांनी जायचे सामाजिक विषमता होती, पण महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना येण्यास प्रवृत्त केले अशा पद्धतीने एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचा विचार केला असून होऊन त्यामध्ये येणाऱ्या स्त्री प्रतिमांचा व त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता स्त्री जीवना विषय चित्रण आभाळाएवढी या कादंबरीत केले आहे.[ads2]
आभाळाएवढी मधील समाजदेखील एकोणिसाव्या शतकातील म्हणजे महात्मा फुले यांच्या काळातील होता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना देखील अस्पृश्य म्हणून ब्राह्मणांकडून समाजात विषमतेची वागणूक मिळाली शिक्षणात देखील जातीय विषमतेचे चित्र पहावयास मिळते ब्राह्मणांच्या मुलांना इंग्रजी शाळेत अगोदर प्रवेश दिला जातो नंतर इतर जातीच्या मुलांना देण्यात येतो म्हणून ब्राह्मणाची मुले शिकतात मामलेदार होतात व इतर समाजातील मुलांना शाळेचा उपयोग नाही आभाळाएवढी या कादंबरीमध्ये देखील अस्पृश्यतेचे असे अनुभव पहायला मिळतात महात्मा फुले ब्राह्मण मित्राच्या निमंत्रणावरून लग्नाला गेले होते लग्नाच्या वरातीत ते मित्रांना समवेत चालत होते तेथे अचानक धोंडभट ब्राह्मण ज्योती जवळ आला आणि म्हणाला, “काय रे, शरम वाटत नाही तुला! तू शूद्र माळ्याचा पोर .शूद्र असताना आमच्या ब्राह्मणांचा लग्नाला येतोस? मिरवणुकीत चालतोस ! तू हलक्या जातीचा आहेस. तुझा मुळे धर्म कार्याला विटाळा होत आहे” म्हणजेच महात्मा फुले यांच्या काळात देखील असा भेदाभेद होता त्यांना देखील ब्राह्मण समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळाली जातीय विषमता पाळली जात होती.[ads3]
शूद्रांना व स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले होते .दारिद्र्य व अज्ञान यांच्यात दोन्ही समाज कुजत होते. ही अवस्था फुले काळात होती .ती इतर जातीतील लोकांनी शूद्रांना आश्रय दिला, तर त्यांचे घर वाळीत टाकण्याचा प्रकार देखील फुले काळात होता. त्यामुळे शुद्ध जातीतील लोक उच्च जातीतील लोकांना दबूनच जीवन जगत होते.[ads4]
प्राचीन काळापासून धर्माचे स्वरूप बदलत गेले वेगवेगळी तत्वे ही धर्मग्रंथांचा अनुषंगाने पुढे आणली हेच धार्मिक तत्त्वज्ञान विविध धर्मग्रंथांचा अनुषंगाने मांडले आहे महात्मा फुल्यांच्या काळात वेगवेगळे धर्म उदयाला आले होते त्यांची स्वतंत्र अशी विचारधारा होती तत्वज्ञान होते .त्यांचे वर्णन आभाळाएवढी मध्ये हिंदुराव गोविंद बनसोडे यांनी केले आहे महात्मा फुले यांच्या काळात अस्पृश्यांची अतिशय दयनीय अवस्था होती सर्व कामे ही अस्पृश्यांनी करावीत असे धर्मग्रंथात सांगून ठेवले होते. त्यामुळे शूद्र समजला जाणारा समाज हा उपेक्षितच राहिला. या समाजासाठी फुले यांनी शाळा सुरु केली पण त्या शाळेत खूप थोड्या मुली येत होत्या रामनाक पट्टे वाल्या ची मुलगी शाळेत येत होती. ती बरेच दिवस शाळेत आलेली नसल्यामुळे सावित्रीबाई ती शाळेत का येत नाही म्हणून विचारपूस करायला घरी गेल्या तेव्हा रामनाक पट्टेवाला म्हणत, ” बायसाब आमचं हे दिस आता संपणार हायती ‘कसे? “मी ह्या सोन्यासारख्या लेकरांस्नी घेऊन पाद्री साहेबाच्या बंगल्यावर रहायला जाणार हाय प्रभू येशू च्या वटयात जाणार आहे” ख्रिश्चन होणार आपल्या धर्मात जन्मलो म्हणून ही दशा हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे आपली ही दशा झाली म्हणून मी धर्माँतर करणार आहे असे रामनाक पट्टेवाला सावित्रीबाईंना सांगतो, पण सावित्रीबाई त्याला आपल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगतात त्या म्हणतात सर्व धर्म समान आहेत. तेव्हा तू धर्मांतर करू नकोस मानवता हाच खरा धर्म आहे.[ads5]
ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या त्यामुळे ब्राह्मणांना जोतीरावांचा राग आला. ज्योतीबांनी धर्म बाटविला अशी त्यांची समजूत झाली वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ज्योतिबांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी सर्व ब्राह्मणांना एकत्र करून जात-पंचायत घेऊन ज्योतीचे गाऱ्हाणे गायला सुरुवात केली, त्यावेळी मोरभट म्हणाले “आम्ही जोत्याविरुद्ध माळी समाज उठविला आहे तो त्याची बायको ख्रिश्चन होणार आहे अशी वार्ता त्यांच्यामध्ये पसरविली आहे”. वरील विवेचनावरून असे लक्षात येते की एकोणिसाव्या शतकातील तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहता धर्मविषयक चित्रण अस्वस्थ करणारे होते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक जागृती घडविली व समाजाला नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला.[ads1]
अशाप्रकारे एकूणच आपणास आभाळाएवढी कादंबरीतील सामाजिक चित्रणाचा आढावा वरील लेखाच्या आधारे घेता येतो महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या काळातील म्हणजेच एकोणिसाव्या शतकातील समाज रूढी प्रथा परंपरा जातीभेद कर्मकांड विशिष्ट वर्गाची मिरासदारी त्यामुळे समाज हा बुरसटलेल्या विचारांचा विचार शिक्षणाचा अभाव होता त्यामुळे स्त्रियांची स्थिती अस्पृश्यता धर्मविषयक चित्रं आणि लोकसंस्कृतीच्या या माध्यमातून सामाजिक चित्रणाचा आढावा घेतलेला आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा अभ्यास करून प्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले नंतर इतर सामाजिक बदल घडवून आणला हा बदल घडवत असताना फुलेना जो संघर्षमय प्रवास करावा लागला व तत्कालीन समाज कशा पद्धतीचा भुतया समाज दर्शनाचा वेद आभाळाएवढी कादंबरीमध्ये हिंदुराव गोविंद बनसोडे यांनी घेतलेला आहे. ही सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित पहिली चरित्रात्मक कादंबरी आहे.[author title=”डॉ. नूतन लोणकर -नेवसे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/05/Screenshot_20220511-144240_WhatsApp.jpg”]मु़. पो. नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा मो. नं. 9623031635.[/author]