वैचारीक लेख
१५ दिवसांनी सावित्रीबाईंचा १२५ वा स्मृतीदिन: प्रा. हरी नरके

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले १२५ वर्षांपूर्वी १०/३/१८९७ ला गेल्या. त्यांच्या कामाचे मोल नी औचित्य दिवसागणिक वाढते आहे. दशमान कालगणनेत १००, १२५ अशा संख्याना महत्व असते. म्हणून शताब्दी, शताब्दीनन्तरचे रौप्यवर्षं आदी महत्वाचे ठरतात. केंद्रातील प्रतिगामी सरकारला सावित्रीबाई नकोच असणार, पण राज्यातील आघाडी सरकारने व सर्व समाजातील जाणत्यांनी पुढाकार घेऊन १० मार्चला महिला हक्क जागर करायला हवा. त्या सर्वांच्या होत्या.आजच्या पिढीला त्यांचे योगदान सांगण्यासाठी हा कालखंड महत्वाचा आहे.
[author title=”प्रा.हरी नरके” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/Hari-narke.jpg”]जेष्ठ विचारवंत, साहित्यिक, महात्मा फुले साहित्याचे लेखक[author]