मनुवादी विचाराच्या बालेकिल्ल्याच्या सावित्रीमाईचा पुतळा उभा करतांना- डॉ.नागेश गवळी
काल सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीमाई फुले यांचा पूर्णकृती पुतुळ्याचअनावरण सोहळा उभ्या महाराष्ट्राने याची देही याची डोळा बघितला. अनेक शेणा चिखलाच्या लाथा सहन करून शिक्षणाची गाथा बहुजणांच्या माथ्यापर्यत पोहचविण्याचं महान कार्य ज्ञानजोती सावित्रीमाई फुले यांनी केले. मुलींना अक्षराची ओळख झाली तर त्याच अक्षराच्या आळ्या होतील,ती विधवा होईल तिचा नवरा मरण पावेल असं सांगणाऱ्या धर्मवादी मनुवादी विचारांच्या बालकिल्यातून सावित्रीमाई राबत होत्या. आणि आज त्याच विषमतावादी मातीत महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांचे विचार फुलत आहेत,दरवळत आहेत.पूतळा अनावरण होताना हे सगळं डोळ्यासमोर उभा राहत होत मन भरून येत होत.
हे सगळं घडत असताना ते घडवून आणणारे आदरणीय भुजबळ साहेब आहेत. त्याची भूमिका कार्य हे खूप महत्वाचे आहे आणि लक्ष्यात घेण्यासारखे आहेत. नव्हे तर आपण आपल्या आजबाजूच्या निद्राअवस्थेत असलेल्या समाजाला ही सांगावे.
साधा प्रश्न आहे, भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली नसती, कार्य हाती घेतले नसते तर हे सगळं घडलं असत का..?
1) फुले वाडा राष्ट्रीय स्मारक झाले.
2) सावित्रीमाईची जन्मभूमी राज्य स्मारक झाले.
3) महात्मा फुले चे विचार वेगवेगळ्या भाषेतून,साहित्यातून देशभर पोहचले.
4) ग्रामपंचायती पासून संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले विराजमान झाले.
4) सर्व शासकीय कार्यलयात महात्मा फुले बसले.
5)३जानेवारी शिक्षण दिन साजरा होतोय
६)देशाला ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्र सदन मध्ये महात्मा फुले सावित्रीमाई पुतळा
हे फक्त महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयावर काम केले
असं कितीतरी काम भुजबळ साहेबांनी उभा केलेय. ते सनातनच्या विरोधात उभे राहुन या बहुजन समाजाच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं कार्य महात्मा फुलेच्या नंतर भुजबळ साहेबांनी केलं आहे. ही जाणीव नेहमी आपण उरात ठेवावी व इतरांनाही सांगावी.
[author title=”प्रा.डॉ. नागेश गवळी” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/02/IMG-20220215-WA0019.jpg”]महात्मा फुले विचारवंत, व्याख्याते[/author]