आपला जिल्हा

समता परिषदेचे संघटन वाढविण्यासाठी वाडावार्डात शाखेची स्थापना करा – ॲड. सुभाष राऊत

जालना- दि. 08 | महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समतेचे विचार घराघरात पोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून हेच विचार आपल्या माध्यमातून आपल्या नजीकच्या आपल्या वाड्यातील घराघरात पोहोचवून वार्ड तेथे समता परिषदेची शाखा स्थापन करावी असे प्रतिपादन समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी जालना येथे आयोजित समता परिषदेच्या बैठकीत प्रसंगी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार समता परिषदेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज दि. 7 फेबु्वारी सोमवार रोजी जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे जालना शहराध्यक्ष दीपक वैद्य यांनी आयोजीत केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button