ज्ञानजोती सावित्रीमाई फुले यांचे कार्य

“कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन,
सावित्रीमाईंचा जन्म स्त्री ला सन्मान देऊन गेला”.
माईंचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य परिसर हे नुसतं जन्मगाव नाही तर ज्ञानाच्या शक्तीपीठ व ऊर्जा देणाऱ्या एक मोठं ऊर्जा स्थानच म्हणाव लागेल.
त्यांचं बालपण नायगाव येथे गेले. लहानपणापासून धाडसी, धैर्यशील, निर्भीड अशा स्वभावाच्या होत्या. अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा महात्मा फुले यांच्याशी विवाह होऊन फुले कुटुंबीयांच्या त्या स्नुषा झाल्या.
शिक्षणाच्या ज्ञानाचा दिवा लावून घरांच्या उंबरठयापरयत ज्ञानाची गंगा पोचणाऱ्या आशिया खंडातील ह्या पहिल्याच महिला ठरल्या त्यांनी लग्नानंतर मातीची पाटी व काडीची पेन्सिल धरून शिक्षणास सुरुवात केली. आणि पहिले अक्षर ‘शेठजी ‘असे लिहून सुरुवात केली. शिक्षकच नाहीतर त्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार केले. शिक्षणाशिवाय बहुजनांचा विकास अंधश्रद्धा रूढी-परंपरा यामुळे प्रगती होणार नाही हे ओळखून फुले दाम्पंत्यानी शिक्षणाची कवाडे उघडी केली. त्या काळात हे सहजासहजी साध्य झाले नाही. तरी माझ्या माईंनी शेण, चिखल, दगडांचा मारा निमूटपणे सहन केला.
पण जेव्हा एक धटिंगण अब्रूची भाषा बोलू लागला तेव्हा त्यांनी भर चौकात गर्दीमधे कशाचा ही विचार न करता त्याच्या थोबाडीत मारली. मी शिकवणार माझ्या रस्त्यात परत आलास तर बघ असे धमकावले. सनातनी धर्मांचे लोक एका बाजूला छळत होते तरीदेखील त्यांनी सती जाणे, केशव पण, अनाथ मुलांसाठी बाल प्रतिबंद गृहे, विधवा महिलांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तयार केली. व अनैतिक संबंधातून होणाऱ्या मुलांना आश्रय देणे हे व विधवा महिलांचे बाळंतपण करणे यासारखी कार्य त्यांनी स्वतः केली तसेच अस्पृश्यांसाठी पाणी मिळणे मुश्कील झाले त्यावेळी त्यांनी स्वतःची पाण्याची विहीर खुली करून दिली.
समाजा खातर त्यांना प्रसंगी आज्ञापालन म्हणून पतीबरोबर गृहत्याग ही करावा लागला. तरी त्या डगमगल्या नाहीत. शेटजींचया नंतरही त्यांनी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले. सत्यशोधक समाजाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. दुष्काळ काळात लोकांना अन्नछत्रा चे नियोजन करून काम केले. त्यावेळचे हे टाटा बिर्ला अंबानी होते तरी त्यांनी समाजासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी या दाम्पत्याने सर्व प्रकारचे योगदान दिले. तर ब्राम्हण विधवा काशीबाई या महिलेचा एक मुलगा दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवून त्यास डॉक्टर बनवले.[ads1]
आज या करोना काळात असे यशवंत व मुली कितीतरी अनाथ आहेत त्यांना आधार देण्याचं काम समाजाने अंगीकारले पाहिजे. माईंनी जसे प्राण पणास लावून काम केले तेवढे जरी जमले नाही तरी सामाजिक बांधिलकी जपून निस्वार्थीपणे भेदभाव न करता जाती-धर्माचे तेढ निर्माण न करता फुले दांपत्याचे विचार अंमलात आणण्याची गरज आहे. एकशे पन्नास वर्षांपूर्वीचे त्यांचे विचार होते ते आजही वास्तविक ज्वलंत प्रश्नाना उत्तर देऊ शकणारे आहेत. आपले हक्क भीक न मागता ते मिळवण्यासाठी पुरोगामी असलेले त्यांची विचारधारा तावून-सुलाखून बघून ते आत्मसात केले पाहिजेत. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचार-कार्यांनी आपल्याजवळ निश्चितपणे आहेत. हे समजून उर्वरित त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जागे झाले पाहिजे लोक हो उठा जागे व्हा हीच वेळ आहे, आता नाही तर कधीच नाही.[ads4]
परत गुलामगिरीत जगण्यापेक्षा प्रत्येक घराघरात फुले दांपत्य निर्माण झाले पाहिजेत. आज माईंच्या कार्यामुळे आकाशाला गवसणी घालणायाइतपत स्त्रिया शिकल्या आहेत. पण नुसते शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यापेक्षा विचाराने सुशिक्षित झाल्या पाहिजेत. सनातन धर्माचे वर्चस्व हे त्यांच्या ज्ञानामुळे नसून त्यांनी समाजाला समाजात पसरलेल्या अज्ञानामुळे आहे ही गोष्ट प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे.[ads5]
ज्या छोट्या जंतूंनी जगाला हादरून सोडले आहे त्यावर सकारात्मक राहून लढा देऊन त्यावर विजय मिळवला पाहिजे. अंधश्रद्धेला चिकटून न राहता वाण म्हणून सावित्रीमाईंचे पुस्तक देऊन त्यांचे विचार पोहोचवले पाहिजेत. “ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. ही विचारधारा ठेवून कर्म करा म्हणूनच सावता माळी महाराज म्हणतात” स्वकर्म व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात”. शेवटी एवढेच म्हणू इच्छिते ‘तुझ्या मुक्तीसाठी दिली होती हाती पाटी, करूणेची मूर्ती माझी ज्ञानज्योती’.
🙏जय ज्योती जय क्रांती 🙏[author title=”सौ. संगीता शशीकांत बोराटे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220118-WA0002-e1642484299390.jpg”]ई. 102 नवरत्न स्वस्तिक सोसायटी ससाणे नगर हडपसर पुणे 28 मो. नं. 8779961140[/author]