स्री शिक्षणाच्या कुलदैवत क्रांतीजोति सावित्रीमाई फुले
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त आयोजित लेखमाला

बहुजन, महिला शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटवून इंग्रजांसह इतरांना धडा शिकविणारी जोतिबांची सावली, भारताची प्रथम मुख्याध्यापिका, थोर समाजसेविका, कवियत्री, विद्यादेवी सावित्रीमाई फुले यांना प्रथम नतमस्तक विनम्र अभिवादन. हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करणारी सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्यातील नायगाव येथे झाला. लहानपणापासूनच हुशार व चातुर्यपणा अंगी असल्याने गावात कुणालाही न जुमानणारा गोऱ्ह्याला पकडुन शांत करण्याचे धाडस सावित्रामाईंनी ताकदिने नव्हे तर युक्तीने केले होते.
काही वर्षानंतर जोतिबांसोबत लग्न झाल्यानंतर त्याकाळी बहुजन व मुलींना शिक्षण नव्हते, ते कार्य आपण केले पाहिजे म्हणुन शेतातील कामांसोबत मातीची पाटी आणि आंब्याच्या काड्याची पेन्सिलीने सावित्रीमाई जोतिबांकडुन ग म भ म गिरवु लागल्या. माई शिकल्यामुळे जोतिबांनी शाळा सुरु केली. काही नास्तिक मंडळींचा बहुजनांच्या व मुलींच्या शाळेला विरोध म्हणुन सावित्रीमाईच्या अंगावर दगडगोटे, चिखलफेक केली, पण त्या डगमगल्या नाहीत. एवढा त्रास सहन करुनही आपल्या धनींना झालेला प्रकार सांगितला नाही. सावित्रीमाई खंबीर होत्या. इथपर्यतचा इतिहास सर्व जगाला माहीत आहे. यानंतर शिक्षणाला प्रचंढ विरोध झाला. जोतिसावित्रींना कायमचे घरातुन काढुन दिले. पोटात अन्नाचा तुकडा नसतांना दोघेही बाहेर आश्रयासाठी जागा शोधत होते. एका गावाच्या बाहेर हिंदुस्थानी मुस्लीम समाजाच्या आदर्श समाजसेविका फातिमा शेख या विद्यादेवीने दोघांना अतिथी देवो भव यानुसार घरात निसंकोच प्रवेश दिला.
काही दिवसानंतर पुन्हा शाळा सुरु झाली. सावित्रीमाईंसोबत फातिमा शेखही मुलींना शिकवु लागल्या. शाळांची संख्या वाढायला लागली. त्यांच्या शिक्षणदानावर इंग्रज अधिकारी भारावुन गेले होते. सावित्रीमाईंचा सन्मान केला होता. यासोबत सत्यशोधक समाजाचे कार्य, विधवा परितक्त्यांसाठी आश्रम, पाळणाघरे, दत्तक घेवुन सुधारगृहे, बालगृहे, केशवपन इ. कार्याचा मोफत प्रचार आणि प्रसार सुरु केला. यशवंतराव यांना स्वतः दत्तक घेवुन वकीलीपर्यत शिकविले. सावित्रीमाई अनाथांच्या माता झाल्या. दिनदुबळ्या, बहुजनांच्या दैवत बनल्या होत्या.
आज या सर्व योजना शासन राबवित आहेत, याचा अभिमानही आहे. हीच जयंतीनिमित्त खरी आदरांजली होय. सावित्रीमाईंनी जोतिबांच्या खांद्याला खांदा लावला नाही, वा पाऊल टाकले नाही. व डोक्यावरचा पदर कधीच खाली पडु दिला नाही. पण त्यांच्या मागे राहुन सावली म्हणुनच राहील्या. जोतिबांच्या निधनावेळी दत्तकपुत्र यशवंतराव यांना टिटवे हातात घेण्यास व अग्नीडाग देण्यास उपस्थितांनी विरोध केला. अशा दुःखमय कठीण प्रसंगी सावित्रीमाई पुढे आल्या. कोणताही विचार न करता समाजाच्या चालीरीती परंपरेला तिलांजली देत अश्रुपुसत टिटवं हातात धरलं…… व जोतिबांना खांदाही द्यावा लागला……. ऐवढेच नव्हे तर…. तर आपल्या पतीला हंबरडा फोडीत अग्नीडाग देणारी भारतातील एकमेव पतिव्रता मातोश्री म्हणजे सावित्रीमाई होय.
पु़ढे सत्यशोधक समाजाची जबाबदारी घेत जोतिबांचे अपुर्ण कार्य सुरु केले. त्यांच्या अथक परिश्रमाने एका दलित बाळाला खांद्यावर घेवुन साथीचे रोगापासुन मुक्तता मिळावी म्हणुन उपचार केलेत, पण माईंना लागण झाल्याने अनंतात विलीन झाले. अशा थोर विद्यादेवी सावित्रीमाई फुलेंचे नाव मुलींच्या शिष्यवृती योजनेला देण्यात आले. पुणे विद्यापीठाला नाव दिले. नुकताच राजस्थान महाराष्ट्र शासनातर्फे ३ जानेवारीला महिला शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे. जन्मस्थळी नायगावात मानवंदना दिली जात आहे.
मुलींना शिक्षण मिळाले म्हणुन ग्रामपंचायतीच्या शिपायापासुन तर देशाच्या पंतप्रधानपर्यत मजल मारली ते फक्त नी फक्त सावित्रीमाईंमुळेच. मी एकच म्हणेन की,१५० वर्षापुर्वी सावित्रीमाईंचा सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचा आलेखाचे अनुकरण शासन करीत आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. क्रांतीजोति सावित्रीमाई जोतिराव फुले यांना १९१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा[author title=”युवराज पंडीत माळी” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220101-WA0073.jpg”]वरवाडे,शिरपुर जि.धुळे ९८९०४६४७२७[/author]