शिक्षण सम्राज्ञी माई सावित्री
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त आयोजित लेखमाला

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोबा नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला- वाचायला शिकवले त्या काळी स्त्रियांना शिकणे महापाप समजले जायचे. पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास न जुमानता शिक्षण घेतले.
महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इ.स. १९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांना अनेकांनी विरोध केला पण . सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत.
पहिली माझी ओवी गं, सावित्रीच्या बुद्धीला,
स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तु घातला,
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार !
तीच सावित्री आज जगाची शिलेदार !!
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले. बाल विवाह, सती, केशवपन अश्या कित्येक क्रुर प्रथांना त्यांनी विरोध केला. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला, त्यांनी अनेक ठिकाणी समाजसुधारणेसाठी भाषणे दिली. तसेच सावित्रीबाईंनी ‘काव्यफुले’ व बावनकशी सुबोध रत्नकार हे काव्य संग्रह लिहले या थोर समाज सुधारक माई मुळेच आजचा वेळ बदलला. पण लोकांची मानसिकता बदलली नाही आजहीआपल्याला म्हणावे लागते ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ !
सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींनाही शिकवले म्हणून तर आज बस कंडक्टर पासून राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. आज स्त्रिया शिक्षीत होऊ शकल्या ते फक्त सवित्रीबाई फुले यांच्यामुळेच.
सावित्री केवळ तुझ्यामुळे महिलांना
ज्ञान आणि सन्मान जगात आज होतो आहे.
सावित्री उजळवलेस तू , क्रांतिज्योती ज्ञानज्योती दीनांची खरी माय तू
चिखल, माती.,शेणगोळेसावित्री फेकले जरी अंगावरी समाजाने,
स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सहन केले सावित्रीने.
सावित्रीनी ज्योतीबांना सावलीप्रमाणे साथ दिली तसेच मागासवर्गीय स्त्रियांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. पुण्यात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अपार मेहनत घेऊन अन्नछत्र उघडले. थोर मातृदयेशिवाय हे कार्य मुळीच झाले नसते. ज्योतीबांच्या मृत्युनंतर ही त्यांचे कार्य चालूच होते.
१८९७ साली महाराष्ट्रात प्लेगची मोठी साथ पसरली. प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत होत्या तेव्हा त्यांनाही प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ साली प्लेगमुळे त्यांचे निधन झाले व त्यांची प्राणज्योत मावळली.
अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात कैद होती संकटासी करून सामना मुक्त केलीस नारीला. 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला सावित्रीच्या जन्मदिनाचा मान मिळाला.
धन्यवाद![author title=”सुरेखा बाबर.” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220102-WA0063.jpg”]राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोहोळ तालुका कार्यध्यक्ष [ पोखरापुर ] 📲 7447640349[/author]