वैचारीक लेख

झाली क्रांती ज्योती आता क्रांतीशक्ती

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त आयोजित लेखमाला

सनातन वादी व जाति, पंथ आणि रुढी परंपरा यांनी बुरसटलेल्या तत्कालीन आाणिपिछाडीवर असलेल्या समाजाला जुनाट रूढी, परंपरा व धर्मांधता यापासून अलिप्त करण्याचा विचार ज्या महापुरुषाच्या मनात घोळत होता ते म्हणजे महात्मा फुले. समाजातील उच नीचता, लहान मोठे श्रेष्ठ कनिष्ठ ही दरी कमी करण्याचा विचार ज्यांच्या मनात सतत तेवत होता. सन १८०० ते सन १९०० या कालखंडात जन्मलेल्या महात्मा फुलेंचे ( ११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) कार्य आणि विचारधारा मानवी समाजाला एक वेगळी दिशा देणारी ठरली.

स्त्री हे मूलभूत केंद्र विकास व प्रगतीसाठी आहे हे समजून स्त्री शिक्षणाची वाट सुरु केली. “एक स्त्री शिकली तर कुटुंब शिक्षित होईल व सुसंस्कारित होईल अशी धारणा असलेल्या व्यक्तिने समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन शिक्षणसमजले. तत्कालीन परिस्थिती फारच विचित्र होती स्त्रीयांना शिक्षणात स्थान नव्हते, समाज रुढी प्रिय व परंपरावादी होता त्यातच इंग्रजांची सत्ता भारतावर असल्याने फक्त कनिष्ठ नोकरी प्राप्त करण्याइतपतच शिक्षणाची संधी सामान्य जनतेला द्यायची व कारकु नी काम करणारे कारकुन तयार करावयाचे अशीच जणू व्यवस्था भारतात ब्रिटीशांनी केलेली होती.

या सर्व बाबीला फाटा तर द्यायचा व तो कसा हे ठरवून महात्मा फुलेंनी पुणे येथे पहिली स्त्री शिक्षणाची शाळा सुरु केली. या कामी भिडे, महर्षी कर्वे यांची साथ त्यांना मिळाली. पण शिक्षिका म्हणून कोणी काम करायला धजावेना. फुलेंनी पत्नी सावित्रीला शिक्षित केले व स्त्री शिक्षिका म्हणून पहिल्या शाळेत पाठविले. शिक्षणाचे कार्य सुरु झाले. आजची क्रांतिज्योती पहिली ज्ञानज्योती झाली.

आज ३ जानेवारी या मातेचा जन्मदिन कुटुंब शिक्षित व सुसंस्कृत करणारी पहिली ज्ञानज्योत आजच्या दिवशी प्रथम वंदन या मातेला “ज्ञान घनाला”. शिकवायला जात असतांना या मातेने अनेक प्रसंग अनुभवले समाज कंटकांनी तिला छेडले, रस्त्याने शाळेकडे जातांना अंगावर शेण, दगड आदि फेकले असले तरी ती डगमगली नाही. तिथे स्त्री शिक्षकाचे कार्य चालूच ठेवले.

महात्मा फुले दूरगामी विचाराचा महापुरुष त्यांना द्रष्टा म्हटल तर वावगं नाही. उच्च वर्गीय, सामान्य व कनिष्ठ असा भेदाभेद त्यांना मान्य नव्हता. तो हदपार करणेसाठी स्वत: एक आदर्श घालून, स्वतः च्या घरातील पाण्याचा आड हरिजनांसाठी पाणी भरण्यास खुला केला. आपण मानव जात सर्व एक आहोत कोणी उच्च व मध्यम, कनिष्ठ नाहीत. सर्व परमेश्वराची लेकरे सारखी. अहिंसा, दया सर्व धर्म समभाव ही थोर महापुरुष गौतमबुद्ध, वर्धमान महावीर यांची तत्व केंद्रस्थानी मानून भेदाभेद, जातीभेद नाहीसे करण्याचे कार्य महात्मा फुले बरोबरच सावित्रीनेही केले. आणि म्हणून समाज परिवर्तनात क्रांति घढविली ही क्रांतिज्योतीने, हरिजन वस्तीतील वा मागासवर्गीय ( तत्कालीन ) समजल्या जाणाऱ्या वाड्या वा वस्त्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री सावित्रीने पोहचवली व जातिभेद, धर्मभेद, उच्च नीचता इ. चा लोप करण्याचे कार्य सावित्रीने केले.

सावित्री फक्त शिक्षिकाच नव्हती तर ती उत्कृष्ठ कवियत्रि पण होती. त्यांच्या अनेक कविता आहेत. कवि मनाची बोलकी पण मितभाषी कवयित्री आपणास परिचित होते ते तिच्या कवितातूनच. लहानपणीच अज्ञान वयात मुला-मुलींचे लग्न करण्याची प्रथा त्या काळी चालू असताना ती प्रामुख्याने बंद करण्याचे कार्य सावित्रीबाई व महात्मा फुलेंनी केले. बालवयात व अज्ञान पणात समज नसतांना विवाह करणे गैर आहे. त्यामुळे पती पत्नीतले नाते पूर्णपणे माहित होत नाही, हे त्याकाळातील समाजाला समजाविण्याचे कार्य ही सावित्रीने केले.[ads1]

केशवपन- पतीच्या निधनानंतर पत्नीने आपले केससंभार न संभाळता तो पूर्णपणे डोक्यावरून काढून टाकण्याबाबतची प्रथाही विलक्ष होती. यामुळे स्त्रीची विद्रुपता वाढत व तिच्या सौंदर्याला बाधा येते हे जाणून घेऊन महात्मा व सावित्रीबाईने केशवपन पध्दती बंद करण्यासाठी प्रयत्न के ले. अशा रितीने महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारसणीत सावित्रीबाईने मोठी मदत केली व म्हणून समाजातील जाती, वर्ण व रुदी परंपरा इ. ना उच्चाटन करण्याचे व वाईट चालिरितीचे पायबंद घालण्याचे कार्य सावित्रीबाई यांनी केले. म्हणूनच त्या क्रांतिज्योती झाल्यात. एक ज्ञान ज्योत एवढी क्रांति करु शकते हे समाजाला दाखवून दिले.[ads2]

आजची स्तिथी- आजकाल समाजात बिघडत चाललेली स्थिती व स्त्रीयांवरील अत्याचार, बलात्कार, बालिकेवरील बलात्कार व हत्या, आणि त्याची पराकोटी अत्याचार करुन जाळून हत्या करणे असे घडत आहे. ही मानवी समाजाला कलंकित करणारी बाब आहे. नराधम गुन्हे करतात, गुन्हेगार गुन्हे करतात कठोर शासन व्हायलाही वेळ लागतो. जर पोलिस यंत्रणेकडून झाले तर त्यांना शाबसकी मिळते वाहवा होते पण लगेच प्रश्न चिन्हही निर्मा करणारे विरोधकही आपल्याला डॉ. प्रियंका रेड्डीच्या हत्येनंतर याचिका कोर्टात दाखल करण्याच्या उदाहरणावरुन कळते. असे का व्हावे ? असा प्रश्न सर्वानाच पडतो.[ads4]

म्हणूनच आज गरज आहे सावित्री सारख्या क्रांतिज्योती प्रमाणे क्रांतिशक्तिची. ही क्रांतिशक्ति स्त्रीयांमध्ये निर्माण होणेकामी मर्दानी झाशीवाल्या सारख्या स्त्रीशक्तिला विचार प्रधान पुरुष शक्तिची साथ हवी ज्या यज्ञात ( होमात) निरागस बालिका, स्त्रीयांवर बलात्कार अत्याचार करुन पेट्रोल टाकुन जाळले जाते. अशा नराधमांना व त्यांच्या पाशवी विचाराला अत्याचाऱ्याला समुळ अहुती या यज्ञकुंडात देण्याची गरज समाजाची आहे. यासाठी समाजाने पुढाकार घेतलाच पाहिजे. स्त्रीयांच्या शक्तिशी पाठीशी उभे राहिले पाहिजे. स्त्रीया
आंदोजन करतात, मोर्चा काढतात, निवेदन सादर करतात प त्यासाठीची सक्रिय कार्यवाही तात्काळ होणे अपेक्षित आहे. आजच्या दिनी सावित्रीबाई फुले या क्रांतिज्योतीच्या जन्मदिनी आपण त्यांना वंदन करून
क्रांतिशक्तिच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊ या.[author title=”प्राचार्य विजय थोरात” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20211231-WA0074.jpg”]मोबा. नं.: ९८६०३६५६७७ मेरी, नाशिक[/author]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button