महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा सन्मान करणार – नाना पटोले
मुंबई- दि. 25 | महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी कंबर कसली असून आज दादर मुंबई येथील पक्ष मुख्यालय टिळक भवन मध्ये काँग्रेस ओबीसी विभागाच्या राज्यातील एकूण 305 मुख्य पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आ.नानाभाऊ पटोले,ओबीसी प्रदेश अध्यक्ष मा.भानुदास माळी,माजी मंत्री सुनिलजी देशमुख,प्रभारी सोनल पटेल यांच्या हस्ते देण्यात आले.
ओबीसी ,बहुजन समाज, बारा बलुतेदार , मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजहाच या देशाचा कणा असून भाजप सरकारच्या भुळथापांना बळी पडून स्वतः सह येणाऱ्या पिढीला नुकसान पोहचविण्याचे काम झाले आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीला बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी पुन्हा एकदा बहुजन समाजाला ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करणार असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन भाजपचा खोटा मुखवटा जनतेसमोर आणून सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवहान आ.नाना पटोले यांनी केले.
आजच्या ओबीसीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभाग व जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला,ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी बघून काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांच्या कामाचे कौतुक करताना आ.नाना पटोले म्हणाले कि भानुदास माळी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्याचीच ही गर्दी माळी यांच्या कामाची पोचपावती आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले .
देशातील भारतीय जनता पार्टी सरकारला घटना बदलायची असून आरक्षणे रद्द करण्याचे त्यांची भूमिका दिसते शेतकरी, कामगार, मजूर ,विद्यार्थी हतबल झालेला असून सर्वनाच नोटबंदी ,जीएसटी ,महागाई, गॅस दरवाढ चा फटका , व्यवहारात जनतेला बसलेला आहे . शेतकरी तर एक वर्षापासून तीन कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे. तरीही मोदी सरकारला त्यांना भेटायला वेळ नाही त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आकलन होत नाही ही खरी शोकांतिका मनुवादी आरएसएस बीजेपी सरकारची आहे त्यासाठी जागे व्हा वेळ पुन्हा येत नाही ते आपणाला संपलाय बसलेत भारतीय जनता पार्टीला देशातील सत्तेतून तडीपार करा असे आव्हान कळकळीचे नाना पटोले यांनी केले.
ओबीसी ला संपविण्याचे काम भाजप सरकार करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्यामुळेच मी मोदींशी मतभेद करून खासदारकीचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडलो पण काँग्रेसच्या माध्यमातून ओबीसी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करेल पण ओबीसी बहुजन समाजाला संविधानातील अधिकारांवर गदा येऊन देणार नाही असे छाती ठोकून नानाभाऊ ओबीसी बांधवांना आश्वासन दिले. महाराष्ट्रात माधव फॉर्मुला बहुजनाचा वापरून ओबीसी काँग्रेस विभाग सक्षम करण्याचे आव्हान नानाभाऊ पटोले यांनी केले . ओबीसी विभागाचे महाराष्ट्राचे प्रभारी माजी मंत्री सुनील देशमुख यांनी काँग्रेस महाराष्ट्रात सक्षम करण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना केले व कार्यकर्त्यांनी सर्व स्तरावर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन जनआंदोलन उभे करून भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेतून दूर करण्याचे कळकळीची विनंती प्रभारी सुनील देशमुख केली.
काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी प्रास्तविकपर भाषणात महाराष्ट्रात फिरत असताना आलेला अनुभव सांगताना म्हणाले कि ज्यावेळी मी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जात होतो, त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस विरोधी पक्षाचे अनेक कार्यकर्ते येऊन मला भेटत होते व मोदी आणि कंपनीच्या भुलथापांना बळी पडून आम्ही भाजपात गेलो होतो पण तिथे आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. त्यामुळे आम्हांला पुन्हा काँग्रेस पक्षात स्थान देऊन आम्हांला व देशाला वाचवावे.देशाला काँग्रेस पक्षच वाचवू शकतो हे आम्हांला आता पटले आहे. असे ईतर पक्षातील कार्यकर्त्यांचे बोललेले माळी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.भाजपने सर्व सरकारी मालमत्ता विकून देशाला कंगाल केले आहे. भाजप सरकारने आरक्षण संपविण्याचा कट रचला आहे. पण तो आम्ही यशस्वी होऊन देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून ओबीसींच्या माध्यमातून संघर्ष करू आणि भाजपला सळो कि पळो करू.
त्याच बरोबर काँग्रेस कार्यकर्ता हा शरीराने दुसर्या पक्षात असला तरी तो मनाने काँग्रेस सोबतच आहे त्यांना काँग्रेस पक्षात आणण्यासाठी आम्ही घराघरात जाऊ पण पक्षात येणाऱ्या व पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम नानाभाऊ आपण व ईतर वरिष्ठांनी करावे असे भानुदास माळी यांनी बोलताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून व ” नाना पटोले साहेब तुम आगे बढो हम तुम्हांरे साथ है”. “भानुदास माळी साहेब आगे बढो हम तुम्हांरे साथ है” काँग्रेस पक्षाचा विजय असो , अशा घोषणांनी टिळक भवनचा सभागृह दणाणून सोडले.त्याच बरोबर काँग्रेस ओबीसी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय अधिवेशन लवकरच लोणावळा येथे घेण्यात येईल असे ही श्री.भानुदास माळी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या सह माजी मंत्री सुनिल देशमुख,प्रभारी सोनलताई पटेल माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष प्रा. गजानन खरात , प्रदेश महासचिव सर्वश्री निसार चौधरी , भागवत वानेरे , संजय किनगे , प्रदेश सचिव अजय तायडे , प्रदेश उपाध्यक्ष राजीव घुटे यांना भानुदासजी माळी यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन सरचिटणीस संतोष रसाळकर,प्रदेश उपाध्यक्ष कोर कमिटी सदस्य वसंत मुंडे , दिगंबर राऊत,प्रदेश सचिव जितेश विशे,शैलेश राऊत,प्रमोद निमसे , भगवान कोळेकर , नंदकुमार विमल कटरे शुभांगी शेरेकर , राजेंद्र राख ,पांडुरंग कुंभार , युवराज खरात यांनी परिश्रम घेतले .