संपादकीय

“साहेब तुम्ही आज हवे होते” -मोदींनी कृषी कायदे वापस घेण्याची घोषणा करताच लोकांना राजीव सातव यांची झाली आठवण

गुरूनानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी वादग्रस्त तीन कृषी कायदे वापस घेण्याची घोषणा केली आणि दिल्लीच्या बॉर्डरवर वर्षभरापासून चालू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला यश आले. संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परंतु या सर्वात प्रत्येकाला “साहेब आज तुम्ही हवे होते !” असे वाटून गेले.

या प्रदीर्घ लढ्यात अनेक शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढत होती यात अनेक शेतकऱ्यांना वीरमरण सुद्धा आले. परंतु खऱ्या अर्थाने जिथे कायदे बनतात ते म्हणजे संसद आणि तिथली लढाई महत्त्वाचे असते. ती सार्थपणे लढत होते राज्यसभेचे दिवंगत खासदार डॉक्टर राजीव सातव. आज ते आपल्यात नाहीत, पण आजच्या विजयी दिनी प्रत्येकाला त्यांची कमतरता जाणवून गेली. आणि प्रत्येकाच्या तोंडून “साहेब आज तुम्ही हवे होते. या विजयाचा आनंद लुटण्यासाठी” असं सहजच वाक्य निघून गेले.

हे 3 वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत 17 सप्टेंबर 2020 ला विना चर्चा पास करण्यात आले होते. तर 20 सप्टेंबर 2020 ला राज्यसभेत पारित करण्यासाठी ठेवले होते. तेव्हा डॉ. राजीव सातव यांच्यासह इतर सात राज्यसभा सदस्य यांनी राज्यातील शेतकर्‍यांचा आवाज बुलंद केला होता. अक्षरशः अध्यक्षाच्या खुर्चीपर्यंत जाऊन त्यांनी या विरोधात प्रचंड आक्रमकता दाखवून दिली होती. डॉ. राजीव सातव यांच्यासह इतर सात सदस्यांवर या कृतीसाठी आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती.

एवढे करूनही जबरदस्ती राज्यसभेत हे कायदे पारित करण्यात आले होते. त्या विरोधात डॉक्टर राजीव सातव यांनी संसदेबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रात्रभर अक्षरशा गवतावर बसून आंदोलन केले होते. आज मोदींनी हे कायदे वापस घेण्याची घोषणा करताच सर्वांना डॉ. राजीव सातव यांची आठवण येऊन गेली. त्यांच्या आक्रमक पवित्रा च्या व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसले. खरंच आज राजीवजी आपण आज हवे होते.

प्रविण बोचरे
संपादक-क्रांतिसूर्य न्यूज,
9604295891

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button