Navratri-नवरात्रात अनोखा प्रबोधन कार्यक्रम – बहुजन क्रांतिकारी देवी उत्सव.
अकोट- दि. २० ऑक्टोबर | येथीत भिमज्योत बुद्धविहार, भिमनगर येथे आगळा वेगळा देवी उत्सव नवरात्रोत्सव (Navratri) निमित्ताने साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने बहुजन समाजातील क्रांतिकारी स्त्रीयांचे कर्तृत्व महान आहे. याची जाणीव ठेवून यावर प्रबोधन करून समाजातील वाईट चालिरीती, कुप्रथा आणि अंधश्रद्धा याचा प्रखर विरोध करीत समाजामध्ये न्याय, समता आणि बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया या खऱ्या अर्थाने देवी देवता आहेत. त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची जाणीव ठेवून परिवर्तनशील आणि विज्ञानवादी विचारसरणी आजची गरज आहे. हा उद्देश समोर ठेवून नऊ दिवस(Navratri) नऊ महानायिकांच्या कर्तृत्वावर प्रबोधनपर वर्ग घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माता यशोधरा, राणी दुर्गावती, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फालिमा शेख, मुक्ता साळवे, राणी झलकारी बाई, रमाबाई आंबडेकर यांची जीवन गौरव गाथा लहान विद्यार्थ्यांना सांगण्यात आली
हि संकल्पना भिमज्योत बुद्ध विहाराच्या उपासिका सौ. माला गौतम वानखडे यांच्या विचारातून साकारण्यात आली असून सतत तीन वर्षापासून त्यांनी हा कार्यक्रम स्वखर्चातून राबविला आहे. आणि समाजापुढे आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.असा (Navratri) प्रकारचे कार्यक्रम घेणे हे समाजातील सर्व सुशिक्षीत आणि सुजाण नागरीकांची जबाबदारी आहे, असे मत माला गौतम वानखडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन.