अ. भा.माळी महासंघाचे विश्वस्त राजाराम काठे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
नाशिक- २६ ऑगस्ट | नाशिक जिल्हा माळी समाजाच्या वतिने अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त मा राजाराम एकनाथ काठे दादा यांना त्यांच्या 75 वा वाढदिवसा निमित्त माळी “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळेस माळी समाजातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी आपले त्यांच्या विषयीचे अनुभव व मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब कर्डक यांनी आपले मत व्यक्त करताना माननीय काठे दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ओबीसी समाजाने एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा गिरिष बच्छाव यांनी केले व कार्यक्रमाचे आभार मा ज्ञानेश्वर महाजन सरांनी मानले, कार्यक्रमाचे नियोजन मा अरुण थोरात , संतोष पुंड यांनी केले.
यावेळी मा बाजीराव आण्णा तिडके, मा विजय आण्णा तिडके, मा मधुकर आण्णा जेजुरकर ,मा तांबे मामा, मा राकाशेठ माळी, मा ज्ञानेश्वर महाजन, मा अनिल नळे, मा शंतनु शिंदे, मा गिरिष बच्छाव, जानोरी गावचे सरपंच शंकरराव काठे, अरुण थोरात, नितिन शेलार , अंबादास शेळके , मा प्रभाकर शिरसागर, मंगलाताई माळी, मंगलाताई जाधव, संजय भडके, विष्णुपंत काठे, योगेश तिडके, गणेश तोडके, अशोक केंग, शंकरराव वाघ, किशोर वाघ, सचिन काठे, संदिप बच्छाव , दिपक मंडलिक, विवेक सोनवणे , अभिजीत राऊत, नाना नाईकवाडे, विलास वाघ, सुधाकर जाधव, निवृती बनकर, सुनित त्रिभुवन, ई मान्यवर उपस्थीत घेते.