वैचारीक लेख

लोकशाही:- भारत आणि अफगाणिस्तान भाग-२ विजय पोहनकर

जागतिक अद्वितीय असलेले आपले संविधान हेच खरे हा देश सुरळीत चालविण्याचे गमक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर ऐवजी जर हेच संविधान कोणत्या मनुवादी माणसाच्या हातून लिहिल्या गेले असते तर त्यांचे फोटो/मुर्त्या देव घरात ठेऊन पूजन झाले असते किंबहुना तसे संस्कार पद्धशिर आमच्या डोक्यात भरले असते.असो.! मुळात ऐवढी अद्वितीय बौद्धिक क्षमता पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कडेच होती हेच आमचे भाग्य समजतो.

ज्या भूमीत छत्रपती, जोतीराव,बाबासाहेब जन्मले त्या भूमीला असे कोणतेच तालिबानी नासवू शकत नाहीत हेही तेवढेच खरे. आम्ही JCB विचारांचे लोक,J जोतीराव फुले,C छत्रपती शिवाजी महाराज, B डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे विचारच या देशाला प्रगत करत आहेत,भविष्यात सुद्धा करतील. ह्यावर भारत देशातील नवतारुणांनी विश्वास ठेवत jcb विचारांचा फैलाव करावा त्यांचे विचार आत्मसात करावे. कारण jcb घाणेरडे विचार मुळासगट उपटून फेकण्याची ताकात देते. *नवं तरुणांनी कोणत्याही व्यक्तीचे पूजक न होता वैचारिक पूजक व्हावे नाहीतर *प्रचारक* बनविणारा कारखाना रेशीमबागेत आहेच. सावधान व्हा! असो!

अफगाणिस्तान हा देश बरबाद झाला तो त्यांच्यावर मातृसत्ताक पद्धतीचे विचार नसल्यामुळे राजमाता जिजाऊ साहेब ह्यांच्या विचारावर जर त्या भूमीत कार्य झाले असते तर आज अफगाणिस्तान जागतिक स्थरावर केशर चा निर्यातदार देश असता. अफगाणिस्तान मध्ये केशर, हिंग ही शेती उत्तम होते. शैरियत कायद्यामुळे तेथील महिलांचे प्रचंड नुकसान त्या देशाला महाग पडतील. तालिबान हा विचारच जागतिक धोका आहे.आज जरी ते आम्ही बदलत आहोत ही सत्तेसाठी त्यांची ढोंगी चाल लवकरच जगासमोर येईल.रशिया,चीन, पाकिस्थान या देशांनी तालिबानी ह्यांचे समर्थन केले. मात्र हा मूर्खपणा त्यांच्या अंगलट येईल. तालिबानी हे कट्टरपंथी आहेत. त्यांना मानव जातीचे हित नसून त्यांच्या इस्लामिक कट्टरतेचे पूजन करायचे आहे. त्यांच्या विचारांचा विरोधात बंड करणाऱ्या मुस्लिम धर्मियांना ते खुलेआम मारू शकतात तर ते बाकीच्या धार्मिक लोकांना कसा न्याय देतील.

वाचक मित्रांनो! कट्टरवाद हा माणसाला वाईट मार्गाला घेऊन जतो,बरबाद करतो. तो कट्टरवादी मग मुस्लिम असो हिंदू असो वा कोणत्याही धर्माचा माणूस हा मानवतावादी असावा. *जो जे वाणछिल तो ते पावो ही आमची संस्कृती असली पाहिजे.* सर्व जग सुखी असावे. मात्र सत्तेचा माज,सत्तेची भूक ही मानवाला दानव बनवीत असते हेच अफगाणिस्तान वरून जगाला बघायला मिळत आहे. आपल्या भारत देशात सुद्धा लोकशाहीचा पद्धशिर खून करणे सुरू आहे. सत्तेसाठी वाटेल ते. लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करून त्यांना अंध करायचे. लोकांना संमोहित करायचे, बोट पूर्वेला दाखवायचे काम पश्चिमी संस्कृतीचे करायचे ही पद्धत सध्या भारतात सुरू असून हा ही एक प्रकारे तालिबानी प्रकार आहे. ज्या प्रमाणे देशात दाऊद हरामी निघाला तसेच हिंदू अतिरेकी सुद्धा घातकच आहेत. हा देश सर्वधर्मसमभाव या संविधानिक विचारावर जो पर्यंत चालले तो पर्यंतच येथे शांती, प्रगती आहे. हे येथील नवतरुणांनी आत्मसाथ करावे. पुन्हा बोलतोय!

व्यक्ती पूजक बनू नका,विचारांचे पूजक बना. कारण माणसात अवगुण असतातच.कोणत्याही व्यक्तीला अति महत्त्व दिले की तो तालिबानीच होतो. सत्तेसाठी तो कासावीस होतो, हिटलर ने सुद्धा आधी देशभक्ती, देशप्रेम दाखवीत सत्तेवर मांड बसविली होती. शेवट भयावह झाला कारण हिटलर देशाला अंध बनवून सत्य लपवत होता. देशभक्तीच्या नावाने जर्मनी लोक अंध झाले होते. कोणताही विचार टोकाचा असला की विध्वंस ठरलेला आहेच,हे सांगायला ज्योतिष लागणार नाही. हा इतिहास आहे.

शेवटी आपल्या सर्वांपुढे एकच मागणे आहे. या देशाच्या संविधानाला वाचवा. तरच देश वाचेल.

संविधान बदलणारी औलाद वाढत आहे,त्यांचा बंदोबस्त मतपेटीतून करा. संविधानिक मार्गाने त्यांना हरवा. सत्तेसाठी बौद्धिक गुलाम बनू नका. पैसा,संपत्ती ही क्षणात सोडून जीव घेऊन पळून जावे लागते हेच अफगाणिस्तान सध्या जगाला सांगत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला सुद्धा सुरक्षा दिलेली आहे. किती सशक्त असेल आपली घटना. तुम्ही आम्ही रस्त्यावरील कुत्र्याला सुद्धा मारू शकत नाही. अफगाणिस्तान मध्ये दिवसा ढवळ्या माणसं मारली जात आहेत. विचार करा,भक्त न बनता देशाचे वैचारिक माणसे बना.

लेखक
विजय विमल सहादेवराव पोहनकर
जळगांव (जामोद)जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ) भ्रमणध्वनी 9579141618

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button