लोकशाही :- भारत आणि अफगाणिस्तान.-भाग १ – विजय पोहनकर
जागतिक एकच विषय आता मुख्य आहे तो म्हणजे अफगाणिस्तान. भारत या विकसनशील देशाने अविकसित/आतांकी अफगाणिस्तान लोकशाही रुजवी म्हणून बिलियन डॉलर मध्ये गुंतवणूक केली. अफगाणिस्तान संसद भवन,रस्ते,वीजनिर्मिती प्रकल्प त्यात आहेत. आजची अफगाणिस्तान या देशाची ही स्थिती का झाली ? काही कारणे बघितली तर गेली 20 वर्ष दुसऱ्यावर अवलंबून राहणारी जमात तयार झाली की हीच परिस्थिती निर्माण होणार. एकसंघ देश व आपल्या मनगटावर विश्वास ठेवून जो देश चालणार नाही त्याचे हेच हाल होतील ह्यात शंका नाही.
आज भारत देश स्वतंत्र होऊन 74 वर्ष झालीत, अमृतमहोत्सवी वर्षात आपण पदार्पण केले. का? कोणती जादू आपल्यात आहे ? विविधतेने नटलेला,हजारो जाती, 7 धर्म घेऊन चालणार हा देश,भाषा,वेशभूषा, देहबोली,संस्कृती, खानपान सगळं वेगळं आहे. प्रत्येक 50 किलोमीटर वर भाषेचा लहेजा बदलतो. बौद्धिक क्षमता बदलते. तरी सुद्धा भारत देश मागील 74 वर्षांपासून प्रगतीकडे निर्भीडतेने निघाला. विकसनशील देश म्हणून जागतिक स्तरावर उभा राहिला. येथील स्त्रियांना स्वतंत्र आहे. कोठेही कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो.
अफगाणिस्तान मधील विमानतळ व स्थिती बघितली तर आपल्या येथील बसस्थानक सुद्धा या पद्धतीचे नाही. किती भयावह परिस्थिती असेल ह्याची फक्त आणि फक्त विचारविनामय शिवाय काहीच विषय आपण समजू शकत नाही. टोकाचा कट्टरवाद हा देशाला घेऊन बुडतो हेच आम्हाला येथे सांगायचे आहे. कट्टरपंथी तालिबानी हे मानव जातीचे नसून नरसंहार करणारे दानव आहेत. असो.!
मुळात जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली घटना जर या देशात नसती तर विचार करा असा विविधतेने नटलेला हा देश एकसंघ राहिला असता का ? जे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नावाने नाकमुरडतात त्यांना म्हणावे बघा जरा अफगाणिस्तान मध्ये जाऊन. कुछ पल तो गुजारो अफगाणिस्तान मैं. आज आपण जे स्वतंत्र उपभोगत आहोत त्याचे पूर्णतः श्रेय हे पूजनीय डॉ बाबासाहेब ह्याना जाते.
येथील चार स्तंभ त्यांनी उभारून स्वतंत्र भारत कसा प्रगत राहील ह्याची मांडणी करून लोकशाही कशाला म्हणतात हे जगाला दाखवून दिले. लोकप्रतिनिधी, प्रशासन,न्यायालय, पत्रकार हे स्तंभ आजही आपली भूमिका आपल्या चौकटीत राहुन पार पाडत,देश प्रगती कडे एकसंघ ठेवून घेऊन जात आहेत. ही किमया संविधानात आहे. भारतीय घटना जगात उत्तम अशी आजही ठरली उद्याही राहील. या देशातील स्त्रियांना गुलाम समजणारी मनुवादी घटना जाळून स्वतंत्र भारतातील सर्व लोकांना समाविष्ट करून घेत.
*आम्ही भारताचे नागरिक* या एका ओळीत देश एकसंघ बांधण्याची किमया डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली. नाहीतर ज्या प्रमाणे तालिबानी लोक स्त्रियांना वागणूक देतात तीच परिस्थिती माणुकायद्यात होती. स्त्रियांना फक्त वापरायची वस्तू म्हणून घरात कोंडून ठेवणारा मनु कायदा जाळला गेला नसता तर आपला देश सुद्धा एक तालिबानी राहिला असता.
या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचेच विचार प्रगत करू शकतात. हा देश जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिला तर एक दिवस डॉ अब्दुल कलाम सर ह्यांच्या स्वप्नातील भारत उभा राहील एवढे मात्र नक्की. लक्ष ठेऊन रहा,अफगाणिस्तान घडामोडीवर.
तूर्त थांबतो.
लेखक
विजय विमल सहादेवराव पोहनकर
जळगांव (जामोद)जिल्हा बुलढाणा (मातृतीर्थ) भ्रमणध्वनी 9579141618
One Comment